शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विजेअभावी पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:47 AM

मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दररोज वीज वितरण कार्यालयामध्ये चकरा मारत आहेत. आश्‍वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाही. त्याचा फटका रब्बीच्या पिकांना बसत आहे.   सध्या सुरळीत स्वरूपात वीजही शेतकर्‍यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, कपाशी ही पिके आहेत. त्यांना पाण्याची सक्त गरज आहे; मात्र वीज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांची उत्पादकता घटण्याची भीती आहे. रात्रीतून फक्त चार तास वीजपुरवठा सुरू असतो. तो ही काही भागात पूर्णवेळ नसतो. त्यातच तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या कारणाखाली बर्‍याचदा वीज प्रवाह बंद असतो. मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जे काही थोडेफार पाणी उपलब्ध आहे ते पाणीसुद्धा वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने पिकांना देता येत नाही. या प्रकारामुळे शेतकर्‍यांमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात रोष आहे. गेल्या दोन-तीन वर्षांंपासून मेहकर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. नोटबंदी, पिकांना भाव नसणे, वेळेवर कर्ज न मिळणे यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना आता विजेअभावी रब्बी हंगामही शेतकर्‍यांच्या हातून जातो की काय, अशी भीती आहे. त्यामुळे शेतीसाठीचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी आहे.

चार गावात होत आहे नुकसानअकोला ठाकरे, रत्नापूर, हिवरा साबळे, कोयाळी सास्ते या भागात वीज पुरवठा होत नसल्याने अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मेहकर तालुक्यातील कोयाळी सास्ते, बाभुळखेड येथील शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना भेटून अडचणीही सांगितल्या. अकोला ठाकरे येथील माजी सरपंच विष्पुपंत ठाकरे, रंजन पैनकर, विश्राम ठाकरे, शिवाजी ठाकरे, गजानन ठाकरे, सुधाकर ठाकरे, अमोल चव्हाण, गजानन बोरकर, संजय ठाकरे, नागेश ठाकरे, माजी सरपंच अरुण पोपळघट, या शेतकर्‍यांनी सुरळीत वीज पुरवठय़ाची मागणी केली आहे.

कर्मचार्‍यांची कमतरता; रोहित्रही मिळेनाअपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विजेसंदर्भातील कामे तालुक्यात खोळंबली आहेत. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहे. अधिकार्‍यांना, शेतकर्‍यांचा रोष सहन करावा लागत आहे. वीज रोहित्र जळाल्यास त्वरित शेतकर्‍यांना ते बदलून मिळत नाही. खामगाव येथून वीज रोहित्र आणण्यासाठी शेतकर्‍यांनाच खर्च करावा लागतो, अशी ओरड होत आहे. अन्य साहित्याचाही वीज वितरण कंपनीकडून वेळेत पुरवठा होत नाही, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Power ShutdownभारनियमनFarmerशेतकरी