शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या - ना.पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:11 IST

सिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.

ठळक मुद्देजिजाऊ जन्मोत्सवाचा साधला मुहूर्त ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा शुभारंभ 

अशोक इंगळे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री ना. पांडुरंग फुंडकर हे होते. व्यासपीठावर खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, माजी आ. तोताराम कायंदे, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुकाअ षण्मुखराजन एस., विनोद वाघ, जि.प. सदस्य सरस्वती वाघ, राजेश लोखंडे, ज्योती खेडेकर यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या, की मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाकारल्या जात आहे. मुलगी कधीही आई-वडिलांना अंतर देत नाही, मग आपण का त्यांना नाकारतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेच्या उदरात मुलगी असते, ती माता अश्रू ढाळते, ही प्रवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणजे एका मुलीवर कुटुंब नियोजन करेल, त्या मुलीच्या नावे ५0 हजार रुपये डिपॉझिट करण्यात येतील. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणार्‍याला त्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी २५-२५ हजार रुपये टाकण्यात येतील. त्या पैशांच्या व्याजावर मुलीचे संगोपन, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केले जातील. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्याच धर्तीवर भाग्यश्री योजना सुरू केली. ग्रामविकास या योजनेबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब आहेत, की २५-२५ वर्षे या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ग्रामविकास योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ११४ कोटींची कामे मंजूर करण्यात आली.  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३0 हजार कि.मी. रस्त्याचे काम येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत. माझ्या खात्याचा कणा अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या मानधनात वाढ करून २८0 कोटींचा बोजा वाढला आहे. येत्या अधिवेशनात ३८0 कोटी वाढीव बजेट मंजूर करून त्यांची भाऊबीज ही दुपटीने वाढणार आहे. संघर्ष यात्रेचा शुभारंभ जिजाऊ मातेचे दर्शन घेऊन याच नगरीतून केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पाच वर्षांत महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी दिला. सर्वप्रथम ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते माझी कन्या भाग्यश्री या रथाची फीत कापून शुभारंभ केला. ही रथयात्रा सिंदखेडराजा ते चोंढीपर्यंत आणि नायगावपर्यंत जाणार आहे.- 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा