शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या - ना.पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:11 IST

सिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.

ठळक मुद्देजिजाऊ जन्मोत्सवाचा साधला मुहूर्त ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचा शुभारंभ 

अशोक इंगळे। लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : ज्या जिजाऊंनी शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे, ही बाब चिंताजनक असून, मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री ना. पांडुरंग फुंडकर हे होते. व्यासपीठावर खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, माजी आ. तोताराम कायंदे, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुकाअ षण्मुखराजन एस., विनोद वाघ, जि.प. सदस्य सरस्वती वाघ, राजेश लोखंडे, ज्योती खेडेकर यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या, की मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाकारल्या जात आहे. मुलगी कधीही आई-वडिलांना अंतर देत नाही, मग आपण का त्यांना नाकारतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेच्या उदरात मुलगी असते, ती माता अश्रू ढाळते, ही प्रवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणजे एका मुलीवर कुटुंब नियोजन करेल, त्या मुलीच्या नावे ५0 हजार रुपये डिपॉझिट करण्यात येतील. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणार्‍याला त्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी २५-२५ हजार रुपये टाकण्यात येतील. त्या पैशांच्या व्याजावर मुलीचे संगोपन, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केले जातील. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्याच धर्तीवर भाग्यश्री योजना सुरू केली. ग्रामविकास या योजनेबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब आहेत, की २५-२५ वर्षे या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ग्रामविकास योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ११४ कोटींची कामे मंजूर करण्यात आली.  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३0 हजार कि.मी. रस्त्याचे काम येत्या पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत. माझ्या खात्याचा कणा अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या मानधनात वाढ करून २८0 कोटींचा बोजा वाढला आहे. येत्या अधिवेशनात ३८0 कोटी वाढीव बजेट मंजूर करून त्यांची भाऊबीज ही दुपटीने वाढणार आहे. संघर्ष यात्रेचा शुभारंभ जिजाऊ मातेचे दर्शन घेऊन याच नगरीतून केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पाच वर्षांत महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी दिला. सर्वप्रथम ना. पंकजा मुंडे यांच्या हस्ते माझी कन्या भाग्यश्री या रथाची फीत कापून शुभारंभ केला. ही रथयात्रा सिंदखेडराजा ते चोंढीपर्यंत आणि नायगावपर्यंत जाणार आहे.- 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजा