शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

अंतिम वर्षांच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेणे अशक्यच : परिचर्चेत उमटला सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 13:02 IST

३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयारच नसल्याचा सूर लोकमतच्या आॅनलाईन परिचर्चेत उमटला.सूर

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिला असला तरी ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयारच नसल्याचा सूर लोकमतच्या आॅनलाईन परिचर्चेत उमटला.सूरराज्य सरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याविषयी निर्णय दिल्याने राज्य सरकार, विद्यापीठ आणि महाविद्यालयांना ती घ्यावीच लागणार आहे. ३० सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालये तयार नसल्याचे अनेक प्राचार्यांनी सांगितले. विदर्भासह राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी पुणे, औरंगाबाद येथे शिक्षणासाठी गेलेले होते. कोरोनामुळे हे विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षा देण्यासाठी पुन्हा ही महानगरे गाठावी लागणार आहे. त्यामुळे, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. या निधीची तरतूदही शासनाने करावी. फिजिकल डिस्टन्सीग ठेवून परीक्षा घेतल्यास अनेक महाविद्यालयांमध्ये खोल्या कमी पडणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यात नेटवर्कची समस्या असल्याने आॅनलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे सर्वच प्राचार्यांनी सांगितले. सहा महिन्यांचा कालावधी कमी करून थेट जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरू केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल,असेही काही प्राचार्यांनी सांगितले. या परिचर्चेचे संचालन प्रा.डॉ.बाळकृष्ण इंगळे यांनी केले.कोरोनाचा संसर्ग वाढत असताना ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अशक्य आहे. राज्य शासनाने केंद्र आणि युजीसीला विनंती करून नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये परीक्षा घेण्याची मुदत वाढवावी. अनेक महाविद्यालये कोविड सेंटर आहेत. निजंर्तुकीकरणासाठी लागणारा निधी शासनाने द्यावा. परीक्षा सप्टेंबरमध्येच घेतल्यास महाविद्यालये परिक्षा केंद्र कोरोनाची हॉटस्पॉट ठरतील.-प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे, अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक आघाडी तथा व्यवस्थापन परिषद सदस्य सं.गा.बा.अ.विद्यापीठअंतिम वर्षाच्या परीक्षा या घ्याव्याच लागणार आहेत.फक्त त्यासाठी कालावधी वाढवून द्यावा लागेल. कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच असल्याने विद्यार्थ्यांच्या आणि परीक्षेमध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी प्रत्येक शिफ्टला वर्गखोल्यांचे करावे लागणारे सॅनिटायझेशन व इतर बाबींवर मोठा खर्च होणार आहे. त्याची प्रतिपूर्ती होणे आवश्यक आहे.-डॉ.सुभाष गव्हाणे,प्राचार्य,चिखलीसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. आॅनलाईन परीक्षा घेणे अशक्य आहे. कोरोनामुळे वर्ग खोल्यांमध्ये घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांचे वितरण करून त्यांना घरूनच त्या लिहून आणायला सांगणे हा एक पर्याय ठरू शकतो. विद्यार्थ्यांकडून आलेल्या उत्तर पत्रिका गोळा करून विद्यापीठाकडे पाठवाव्यात. हा पर्याय होऊ शकतो.-डॉ.विजय नागरे,प्राचार्य, दुसरबीडअंतिम वर्षांच्या परीक्षा आॅफलाईन किंवा आॅनलाईन घेणे ३० सप्टेंबरपर्यंत शक्य नाही. प्रवेश प्रक्रीया कोरोनामुळे रखडलेली असतानाच परीक्षा घेण्याचा निर्णय आला आहे. आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नेटवर्कची समस्या आहे. फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करून परीक्षा घेतल्यास वर्ग खोल्या कमी पडतील. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची गरज आहे.-डॉ.अण्णासाहेब म्हळसणेप्राचार्य, बुलडाणा

अंतिम वर्षांच्या परीक्षा दर्जेदारच झाल्या पाहिजे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त नसल्याने परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांना अडचणी येतील असे वाटत नाही. ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे अशक्य आहे. सरकारने जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची गरज आहे. तसेच परीक्षा घेताना महाविद्यालयांना कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करताना कसरत करावी लागणार आहे.-प्रा.डॉ.अनंत सिरसाटबुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी