शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली  कंझारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:36 IST

माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आपल्याला जे आवडते, त्याचीच निवड करणे सर्वात महत्वाचे आहे. बरेचदा आवडीविरूध्द क्षेत्र निवडल्याने आयुष्यात गोंधळ उडतो. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडण्याचे धैर्य आणि त्याला कुटूंबियांचीही तितकीच साथ; यावरच यश अवलंबून असते. माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.

अभिनय या क्षेत्राकडे कश्या वळल्या?लहानपणापासूनच मला नाटकात काम करायची सवय होती. शाळेमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम हा माझ्या आवडीचा विषय होता. तेव्हापासून टीव्हीवर दिसणाऱ्या नट्या आकर्षित करायच्या. आपणही टीव्हीवर दिसावे, असे सारखे वाटायचे. तोच ध्यास शेवटी सत्यात उतरला.

अभिनय करण्याची संधी केव्हा मिळाली?मुळात मी इंजिनिअरिंग करायला पुण्यात आले. बीई करीत असताना सन २०१६ मध्ये सेंकड इअरमधे होते. त्याचवेळी पुण्यात ‘बबन’ चित्रपटसाठी आॅडिशन सुरू होते. त्यात मी सहभागी झाले, आणि माझी निवड झाली. डिसेंबर २०१६ मध्ये हे आॅडिशन झाले आणि त्यानंतर २४ फेब्रुवारी २०१७ ला पहिल्यांदा प्रत्यक्ष सेटवर अभिनय करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून हा प्रवास सुरूच आहे.

नाटकांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?ती पहिली रात्र, कुर्यात सदा टिंगलम ही महत्वाची दोन नाटके आहेत. यासह इतरही अनेक छोट्या नाटकांमध्ये मी काम केले. परंतु जेव्हा बबन हा चित्रपट २३ मार्च २०१८ मध्ये दिग्दर्शीत झाला, तेव्हाच खरी माझी ओळख झाली. मुख्य नायिकेच्या मैत्रिणीचा रोल मला मिळाला. मी त्या भुमिकेला पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच खºया अर्थाने मला ग्लॅमर प्राप्त झाले. सध्या आणखी दोन नवीन चित्रपटात काम करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचे काम सुरू होईल.नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?संयम सर्वात महत्वाचा आहे. अभिनय क्षेत्रात सातत्याने स्पर्धा राहते, ती टिकून राहण्याची. काही वर्षांआधी मोठे नाव कमविलेल्या अनेक अभिनेत्री सध्या पडद्यावर दिसत नाहीत. ही अवस्थाच सगळ्यात आव्हानात्मक आहे. त्यामुळे मिळेत त्या परिस्थिती मिळेल ते काम करण्याची तयारी असली, की नैराश्य येत नाही. सध्याही आपण अनेक महान कलावंतांना अगदी छोट्या जाहीरातीत काम करताना पाहतो. मनाची ही तयारीच आपल्याला सदोदित प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवते. त्यामुळेच कोणतीही भुमिका मिळाली तरी त्या भुमिकेला न्याय देण्यासाठी झटण्याची तयारी असली, म्हणजे अपयशाचे तोंड पाहावे लागत नाही.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत