शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाणी मिळाले नाहीतर बेमूदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 6:08 PM

पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंचासह गावकºयांनी दिला आहे. 

 

जलंब ता. शेगाव : शेगाव नगरपरिषदेच्या जलकुंभावरून टँकरद्वारे सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने गावात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. गावातील पाणीटंचाई निवारणासाठी तातडीच्या उपाययोजना न केल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंचासह गावकºयांनी दिला आहे. जलंब येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शेगाव येथील जलकुंभावरून पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे काही प्रमाणात गावातील पाणीप्रश्न सुटला होता. मात्र २३ फेब्रुवारीपासून हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. गावात सध्या कुठलाही नैसर्गीक स्त्रोत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेगाव नगर परिषदेत विचारणा केली असता संबधित अधिकाºयांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची नगर परिषद प्रशासनाने अवहेलना केली आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १२ हजार एवढी आहे. पाणी नसल्याने प्रशासनाबाबत गावकºयांमध्ये प्रचंड जनक्षोभ वाढला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एखादेवेळी निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांकडे कुठलाही पर्याय नसल्याने तहसिल कार्यालयासमोर १२ मार्चपासून आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संतोष पळसकार, माजी सरपंच बबलू देशमुख, उपसरपंच उमाताई देशमुख, संजय गव्हांदे, प्रकाश देवचे, अर्चना अवचार, जयश्री घोपे, निर्मलाताई तायडे, शितल मोरे, संजय अवचार, विलास गव्हांदे यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावWaterपाणीagitationआंदोलन