शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातून लाकडाची अवैध वाहतूक!

By admin | Updated: April 13, 2017 01:04 IST

बुलडाणा जिल्ह्यातील वनक्षेत्रात वृक्षतोड वाढली : वृक्षाची कत्तल करून परजिल्ह्यात

उद्धव फंगाळ - मेहकर बुलडाणा जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील वन क्षेत्रामध्ये अडजात वृक्षाच्या कत्तलीनंतर सदर लाकडाची वाहतूक परजिल्ह्यात होत आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यातही येथील लाकडांची विक्री होत आहे. शासन दरवर्षी वृक्ष लागवड करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. यावर शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यासाठी विविध मार्गाने जनजागृती करण्यात येते. मात्र, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा शासनाचा उपक्रम बुलडाणा जिल्ह्यात केवळ कागदोपत्रीच सुरु असल्याने शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत. मेहकर व लोणार तालुक्यातील वन परिक्षेत्रात व इतर ठिकाणावरुन विविध जातीच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करुन इतर जिल्ह्यासह परराज्यातही मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. संबंधित वृक्षतोड ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने जंगलाचा ऱ्हास होत आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या घाटबोरी वन परिक्षेत्र तसेच लोणार तालुक्यातील धाड वन परिक्षेत्रात वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड सुरू आहे. या भागात सागवनसह बाभूळ, निंब ही झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातून सागवान, निंब, बाभूळ ही झाडे तोडून त्याची बुलडाणा जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यात विक्रीसाठी नेल्या जात आहेत. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात व तामिळनाडू या राज्यात येथील लाकडांची विक्री होत आहे. १ ते २ झाड तोडण्याचा परवाना काढून त्या परवान्याच्या आधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन जादा झाडे तोडण्यात येत आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे व अर्थपूर्ण व्यवहारामुळे वृक्ष तोडीचा हा व्यवसाय सुरू असून, यामुळे जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने व्यवसाय सुरु असल्याने तक्रारी करुनही त्याचा काही उपयोग होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.‘त्या’ साडेआठ हजार वृक्षांचे काय झाले?शासनाने मागील वर्षी मोठा गाजावाजा करुन बुलडाणा जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला. मेहकर तालुक्यासाठी जवळपास साडेआठ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यावेळी मेहकर तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणेने वृक्ष लागवड केली होती. परंतु लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्षांचे त्या-त्या शासकीय यंत्रणेने संगोपन करुन वृक्ष जिवंत ठेवले, हे पाहणे तितकेच गरजेचे आहे. गतवर्षी वृक्षलागवड झालेल्या ठिकाणी सध्या केवळ ट्रीगार्ड उरले आहेत. आरामशीनची चौकशी करावी!मेहकर व लोणार तालुक्यात असलेल्या आरामशीनवर ठिकठिकाणी सध्या लाकडाचे ढीग पडलेले आहेत. ही लाकडे नेमकी आली कोठून, त्यकडाचा परवाना होता का? तसेच किती लाकडे व कोणत्या जातीची लाकडे तोडण्याचा परवाना होता, याची वरिष्ठांकडून चौकशी करुन संबंधितांकडून कारवाईची मागणी होत आहे.वृक्षतोडीला आळा घालून वृक्षलागवडीसाठी प्रशासनाकडून सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी अवैध वृक्षतोड करताना कुणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.-पी.सी. निर्मल, लागवड अधिकारी, मेहकर.