शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 20:16 IST

जळगाव जामोद- मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.

जयदेव वानखडे - जळगाव जामोदजगात तंत्रज्ञान खुप पुढे गेले विज्ञान एवढी प्रगती केली की नवनवीन शोधांमुळे भौतिक सुविधांचा मानवी जीवनात सुकाळ आला. घरोघरी सोयी सुविधांनी जागा व्यापली. मात्र यातुन सुटला तो आदिवासी वर्ग सातपुड्याच्या जंगलात राहून आपले संघर्षमय जीवन जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी राबतो. अशा जीवनात सुविधांचा विचार कोण करणार? दोन वेळचे जेवण मिळाले तरी खुप काही कमविल्याचा आनंद त्यांचा चेहरा सांगुन जातो आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा हे आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांमध्ये जवळपास १७ आदिवासी गावे वसली आहेत. डोंगराळ भागात आजही एसटी जात नाही. तेथे रस्ते नाहीत, वीज नाही याची तमा न बाळगता हे आदिवासी आपल्या परंपरा जपत जगतात त्यांची घरे अतिशय जुन्या आणि सुविधा नसलेली आहेत. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. भर उन्हाळ्याचे दिवसात उन्हापासून आपल्या मुलांबाळांचा बचाव करण्यासाठी त्यांनी शक्कल लढवून तयार केलेले घर म्हणजे भौतिक सुविधा असलेल्या घरांनाही लाजवेल इतके वातानुकुलीत असते. त्यांच्या घरावर मातीची छपरे आपल्याला आढळून येतात. या मातीच्या छपरामुळे कुळांना माती आणि शेणाच्या लेप देवून स्वच्छ सारवण केल्या जाते चारही बाजुंनी शेणामातीचे कुळ वरून मातीचे छप्पर असलेल्या या घरांना लाकडी बांबुच्या फळ्यांपासून बनविलेला दरवाजा लावण्यात येतो. त्यामुळे घरात येणारी हवा थंड वाहते आणि घरामध्ये ना पंखा ना कुलर तरीही घरे या आदिवासींना एसीचा आनंद घेतात.अशी बनवितात आदिवासी घरावरील छप्परेडोंगरकपारीत गवती छप्पर तर कुठ टिनपत्र्यांची आदिवासींची घरे मात्र उन्हाळ्याची दाहकता त्यांना सोसवत नाही अशावेळी घरावरील छतावर ताडपत्री अंथरली जाते. या ताडपत्रीवर सुकलेल्या गवताचा पातळ थर दिला जातो. आणि त्यावर डोंगराळ मुरुमाची मऊ माती अंथरतात ही झाली छताची मरम्मत तर आजुबाजुला शेणाने लिपलेले कुळ आणि व्हेंटीलेटर म्हणून दरवाजाला बांबुच्या कामठांचे झडप. यामुळे घरात कसे थंडगार वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते आणि आदिवासींचे उन्हापासून संरक्षणही करते. अशाप्रकारे वातानुकुलीत घराचा प्रयोग गेल्या १० वर्षापासून वडपाणी, सोनबर्डी, नांगरटी, कहूपट्टा, भिंगारा, गोमाल, निमखेडी, हनवतखेड, रायपुर, चाळीसटापरी इत्यादी परिसरातील आदिवासी गावांमध्ये केला जातो.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरात वनराई कमी झाल्याने उष्णतामान चांगलेच जाणवते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आदिवासींनी वातानुकुलीत घरांची लढवलेली शक्कल खरोखर उल्लेखनीय आणि कौतुक करण्यासारखी आहे. भौतिक सुविधांमुळे तुम्हाला आजार जडतात मात्र ही घरे खरोखर आरोग्यदायी असुन नैसर्गिक उपचार केंद्राचे काम करणारी आहेत आणि पावसाळ्यात या उताराच्या छपरावरून पाणी घसरून जाते आणि हळुहळू ह्याच छपरांवर हिरवेगार गवतही उगवते त्यामुळे श्रावणात अतिशय सुंदर हिरवीगार घरे पाहायला मिळतात. मात्र त्यातून पाणी गळत नाही, हे विशेष !घराच्यासह इतर बाबतीतही या लोकांचे वेगळेपण पाहायला मिळते. उंचावर मचाण बांधुन त्यावर पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवली जातात. त्यामुळे खेळती हवा आणि मातीची भांडी यामध्ये थंडगार पाणी मिळते. आणि पाणी उंचावर ठेवल्याने रात्री बेरात्री वन्यप्राणी सुध्दा फिरकत नाहीत असे निकोप जीवन येथील आदिवासी कुठली सुविधा नसतानाही जगतात.