शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:23 IST

डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.

‘आररर... सरकार मायबाप… पांडुरंगा, आता कठीण झालं! आम्ही कसं जगायचं? आत्महत्या करू का?— अशा हताश आरोळ्यांनी राहेरी परिसरातील शेत थरारून गेले. शनिवारी मध्यरात्री पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावत कहर माजवला. डोक्याएवढे पाणी साचलेल्या शेतात उभा राहून शेतकरी समाधान गवई अक्षरशः रडला, हंबरडा फोडला. त्याची व्यथा पाहून आसपासचे शेतकरीही हेलावून गेले.

शेत जलमय, हिरवी स्वप्नं उद्ध्वस्त

अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस यांसारखी खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. रात्रीच्या पावसाने शेतात मिनी तलावांचे स्वरूप घेतले आहे. एरवी हिरव्यागार पिकांनी डोलणारी शेती आज नुसती पाण्याने भरलेली खाचरे बनली आहे. शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

बळीराजाची हतबल हाक

आम्ही शेतकरी आता कस जगायचं? कर्ज, बी-बियाण्याचे पैसे, घरखर्च… सगळं कोलमडलंय. सरकार आमच्यासाठी काय करणार?”— अशी कळकळ समाधान गवई याने व्यक्त केली. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून जनतेत संताप उसळला आहे. सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

संकटांची मालिका थांबेना

गेल्या काही आठवड्यांपासून सतत होत असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. उत्पादनाचे नुकसान, महागाई, कर्जफेडीची चिंता— या सर्वांनी शेतकरी नैराश्यात ढकलला आहे. राहेरी परिसरात रात्री दोन वाजता झालेल्या पावसाने शेतजमीन पूर्णपणे जलमय झाली.

बुलढाण्याचा भीषण हिशेब

--यंदा ९२ पैकी तब्बल ७१ मंडळांत अतिवृष्टी, तर १८ मंडळांत पाच वेळा आणि ४ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टीची नोंद.--७७ टक्के मंडळे अतिवृष्टीने ग्रासलेली--२२ सप्टेंबरपर्यंत २ लाख ९६ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान.--अवकाळी पावसासह ही संख्या ३ लाख ५ हजार हेक्टरपर्यंत.--जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९२.९८% पाऊस आधीच.--पाच तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली

हृदय हेलावणारे वास्तव

राहेरीत शेतात पाण्यात उभा राहून हंबरडा फोडणारा शेतकरी म्हणजे संपूर्ण बुलढाण्यातील बळीराजाची दाहक कहाणी आहे. ‘पिके गेली, स्वप्ने गेली… आता जगायचे कसे?’ हा प्रश्न केवळ राहेरीपुरता नाही; तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers Devastated by Rain, Question Survival After Crop Loss

Web Summary : Heavy rains in Raheri, Maharashtra, have destroyed crops like soybean and cotton, leaving farmers desperate. Facing debt and ruined livelihoods, they question how to survive. A farmer's emotional plea highlights the widespread devastation and calls for urgent government aid, reflecting the plight of Buldhana's farmers.
टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी