शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

बुलडाणा जिल्हय़ात जलयुक्त शिवारच्या कामांना निधीचा ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:58 AM

हिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ४६ कोटी ९0 लाख रुपयांची देयके थकीत झाली आहे. परिणामी जलयुक्तच्या चालू वर्षातील कामांना ब्रेक लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे४७ कोटी रुपयांची देयके थकली कामे प्रभावित होण्याची भीती

ओमप्रकाश देवकर। लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ४६ कोटी ९0 लाख रुपयांची देयके थकीत झाली आहे. परिणामी जलयुक्तच्या चालू वर्षातील कामांना ब्रेक लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.वास्तविक थर्ड पार्टी असेसमेंटद्वारे जिल्हय़ातील जलयुक्तची कामे व त्यांची गुणवत्ता मध्यंतरी तपासण्यात आली होती. त्यांचा दर्जा ही चांगला होता. टँकरग्रस्त बुलडाणा जिल्हा टंचाईपासून मुक्त होण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे. गेल्या तीन वर्षाच्या काळात या योजनेचा शेतकर्‍यांना चांगला लाभ झाला आहे; मात्र बुलडाणा जिल्हय़ात झालेल्या कामांची देयके रखडल्याने समस्या निर्माण झाली आहे. आता उन्हाळ्य़ाच्या तोंडावर चालू वर्षासाठीच्या कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविण्याची गरज आहे; मात्र नेमक्या याच काळात हा निधी थकलेला असल्याने अडचण येत आहे.दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने राज्यात भाजपा सरकारने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना आणली होती. मुख्यमंत्री, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या योजनेत विशेष लक्ष घालून कामे प्रभावीपणे होतील, याची काळजी घेतली. त्यामुळे अभियानाला गती आली होती. या योजनेंतर्गत जिल्हय़ातील जवळपास १७ यंत्रणांतर्गत कामे होत आहेत. यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, राज्य सिंचन विभाग, वन विभाग तसेच शासनाच्या इतर विभागाकडूनही कामे होत आहे. जिल्हय़ातील जलयुक्त शिवार योजनेच्या २0१५-१६ आणि २0१६-१७ या आर्थिक वर्षामधील जलसंधारणाची कामे कंत्राटदारांनी पूर्ण केली आहे; पण देयकेच मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हय़ातील ही कामे चालू आर्थिक वर्षात प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामध्ये २0१५-१६ या वर्षातील २८ कोटी ५५ हजार आणि २0१६-१७ या वर्षाची १८ कोटी ३५ हजार असे मिळून ४६ कोटी ९0 हजार रुपयांची देयके थकली आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातून जी कृषी विभागाची कामे करण्यात आलेली आहेत, त्या कामांची देयके अदा करण्यासाठी निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा सुरू आहे.- गणेश भागवत गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर

आमच्यासह इतरही कंत्राटदारांनी शासनाचे काम असल्याने लाखो रुपये या कामात गुंतविले. व्यवसाय म्हटला की, बँकेच्या व्याजाचे पैसेसुद्धा या कामात गुंतविले. बँकांचेही हप्ते थकले. - निखिल क्षीरसागर,  मार्डी, जि. सोलापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार