शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

कारखन्याचे दूषित पाणी थेट सोडले धरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 4:09 PM

केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक एमआयडीसीस्थित एका कपडा फॅक्टरीचे केमीकलयुक्त दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी वायझडी धरणाच्या मुख्य नाल्यात सोडण्यात येत असल्याने नाला व धरणातील पाणी दूषित होत आहे. या पाण्याला दूर्गंधी असल्याने जनावरांनी पाणी पित नाहीत. तसेच पिके देखील धोक्यात आली असल्याने फॅक्टरीच्या या दुषित पाणी तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी चिखली व खंडाळा मकरध्वज शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत तहसीलदार येळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून फॅक्टरी मालकास उपाययोजनेचे निर्देश दिले आहेत.चिखली एमआयडीसीमधील एका टेक्सटाईल कंपनीतून निघणारे केमीकलयुक्त घाण पाणी वायझडी धरणात सोडण्यात येत आहे. या दुषित पाण्याची प्रचंड दूर्गंधी सुटल्यामुळे जनावरे पाणी पीत नाहीत. यासह हे पाणी सुचेत उर्फ बबलू देशमुख, आशिष महाडीक यांच्या शेताजवळ व धरणाच्या ज्या ठीकाणी तुंबते त्या कट्ट्यामधील पाणी काळे पडले आहे व त्याची दुर्गंधी सुटली आहे. तेच पाणी देशमुख यांच्या विहिरीमध्ये येत असल्याने विहरीतील पाण्याचा सुध्दा वास येत असून नाल्याला लागून असलेल्या विहरीतील पाणी दुषीत होऊन वास मारत असल्याने मजुरांना शहरातून पाणी घेऊन प्यावे लागत आहे. या दुषीत पाण्याबाबत फॅक्टरीचे मालक व व्यवस्थापकांकडे शेतकऱ्यांनी धरणाच्या मुख्य ओढ्यात हे पाणी येऊ देऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतू, वारंवार सांगूनही यावर उपाय न झाल्याने आणि जनावरांच्या व माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तथापी हेच पाणी पिकाला देण्यात येत असल्याने जमिनीची पोत खराब होत असल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे. तसेच धरणाखाली पाणीपुरवठा विहिरी असल्याने भविष्यात हेच रसायनयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात वायझडी धरणामध्ये साठवले जाणार असल्याने याचा विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत. यामुळे तातडीने पाहणी करून या रसायनयुक्त दूषित पाण्याबाबत उपाययोजना करण्यात याव्या, दूषित पाणी धरणाच्या मुख्य नाल्याच्या प्रवाहात सोडणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली होती. याअनुषंगाने ६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार येळे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कंपनीच्या मालकांना उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान कंपनीनेही याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे. ओढ्याने केमीकलचे पाणी आल्यास कारवाई करणार असल्याचे अश्वासन तहसीलदारांनी शेतकºयांना दिले आहे. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, स्वाभिमानीचे नितिन राजपूत, मंडळ अधिकारी पाटील, तलाठी गिरी, शेजोळ, बबलू देशमुख, आशिष महाडीक, एकनाथ यादव, शे. जमील शे. अहमद, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीDamधरण