शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानात महिलांचा टक्का वाढला!

By admin | Updated: June 8, 2017 02:31 IST

१५० महिलांचा सहभाग : ६५० नागरिकांनी केला नेत्रदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नेत्रदानाचे महत्त्व जाणून जिल्ह्यातील गत वर्षभरात ६५० नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला. यापैकी १५० महिलांनी आपल्या मृत्यूनंतर हे सुंदर जग दुसऱ्या कुणाला स्वत:च्या डोळ्यांनी पाहता यावे, याकरिता नेत्रदान करण्याचा संकल्प करून सामाजिक दायित्व जोपासले आहे.नेत्रदानासाठी सर्वत्र मोहीम राबविली जात असताना, अनेक सामाजिक संस्थासुद्धा शिबिरांच्या माध्यमातून याविषयी प्रबोधन करताना आढळून येतात. जिल्हात विविध रुग्णालयात गत वर्षभरात जवळपास ६५० स्त्री-पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प केला. यामध्ये १५० स्त्रिया आणि ५०० पुरुषांनी आपली नावे नोंदविली. इतर अवयव दान करण्याबरोबरच नेत्रदानामुळे आपले डोळे आपल्या मृत्युनंतर गरजू व्यक्तीच्या कामी येईल. या भावनेतून नेत्रदानाचा संकल्प केल्यानंतर जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे.मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील कोणतीही व्यक्ती संकल्पपत्र भरून आपली इच्छा पूर्ण करू शकतो, अशी व्यक्ती अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या मरण पावली असता, त्या व्यक्तीचे डोळे सहा तासांच्या आत काढल्यास त्याचा उपयोग दृष्टीहीन व्यक्तीला होतो. डोळ्यांचे रोपण करण्याआधी त्याच्या आजाराची योग्य ती तपासणी करण्यात येऊन डोळ्यांची अवस्था निरोगी आढळून आली, तरच ते रोपण केल्या जातात.ग्रामीण भागात नेत्रदानाविषयी जागृती आवश्यकजिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही नेत्रदात्याचे प्रमाण कमी आहे. याचे कारण म्हणजे ग्रामीण जनतेमध्ये असलेली अंधश्रद्धा व नेत्रदानाविषयी असलेले अज्ञान, पुनर्जन्मावर असलेला ठाम विश्वास, यामुळे ते लोक नेत्रदान करण्यास धजावत नाहीत. मात्र, सुशिक्षित पिढी यातून बाहेर निघताना दिसत आहे. आज तरुण पिढीने ‘नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान’ असे नेत्रदानाचे महत्त्व ओळखले आहे. तरीही नेत्रदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.