शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मृत्यूनंतरही ‘छळ’इथला संपत नाही!

By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST

खामगाव तालुक्यातील स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक गावात प्रेतांची अवहेलना.

खामगाव : सरणावर जातांना इतुकेच कळले होते.. मरणाने केली सुटका..जगण्याने छळले होते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्व यातनांतून मुक्ती मिळते असेच उपरोक्त ओळींतून स्पष्ट होते. मात्र, तालुक्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस् थेमुळे माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे वास्तव असून काही ठिकाणच्या स्मशानभूमीवरील शेड नादुरूस्त आहे. तर अनेक गावांमध्ये स्मशानभूमींना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सो पस्कर म्हणजे अंत्यसंस्कार हाच आहे. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, स्मशानभूमीच्या बकाल अवस्थांमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमी शेडची दुरवस्था झाल्याने आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र आहे.माणूस जिवंत आहे तो पर्यंत सुखा समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतो. जिवंतपणी विविध समस्यांना तोंड देत जगावे लागत असतांना मरणानंतरही त्या सुटत नाहीत. शासन विविध योजनाव्दारे समाजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे. अनेक गावात स्मशानभुमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. पाण्याची सोय नाही. लोखंडी शेडची टिनपत्रे खराब झाली तर काही ठिकाणी बेपत्ता आहेत. स्शमान शेडमधील सिमेंटचे फ्लोरींग उखडले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करताना नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावागावातील स्मशानभुमीच्या विकासासाठी व सुविधा पुरविण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.