शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही ‘छळ’इथला संपत नाही!

By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST

खामगाव तालुक्यातील स्मशानभूमी नसल्यामुळे अनेक गावात प्रेतांची अवहेलना.

खामगाव : सरणावर जातांना इतुकेच कळले होते.. मरणाने केली सुटका..जगण्याने छळले होते. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सर्व यातनांतून मुक्ती मिळते असेच उपरोक्त ओळींतून स्पष्ट होते. मात्र, तालुक्यातील अनेक गावांमधील स्मशानभूमीच्या बकाल अवस् थेमुळे माणसांची मरणानंतरही सुटका होत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी नसल्याचे वास्तव असून काही ठिकाणच्या स्मशानभूमीवरील शेड नादुरूस्त आहे. तर अनेक गावांमध्ये स्मशानभूमींना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे.मृत्यू कुणालाही चुकत नाही. हे शास्वत सत्य असून जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मृत्यूला सामोरे जावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्वात शेवटचा सो पस्कर म्हणजे अंत्यसंस्कार हाच आहे. मनुष्याचा शेवट चांगला व्हावा अशीच धारणा प्रत्येकाची असते. तर मृत्यूमुखी पडलेल्या इसमावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार यासाठी जवळच्या नातेवाईकांची धडपड असते. मात्र, स्मशानभूमीच्या बकाल अवस्थांमुळे मृत्यूनंतरही यातना साथ सोडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील १४ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमी शेडची दुरवस्था झाल्याने आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे चित्र आहे.माणूस जिवंत आहे तो पर्यंत सुखा समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतो. जिवंतपणी विविध समस्यांना तोंड देत जगावे लागत असतांना मरणानंतरही त्या सुटत नाहीत. शासन विविध योजनाव्दारे समाजतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत आहे. अनेक गावात स्मशानभुमीकडे जाण्याकरिता रस्ता नाही. पाण्याची सोय नाही. लोखंडी शेडची टिनपत्रे खराब झाली तर काही ठिकाणी बेपत्ता आहेत. स्शमान शेडमधील सिमेंटचे फ्लोरींग उखडले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करताना नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे गावागावातील स्मशानभुमीच्या विकासासाठी व सुविधा पुरविण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न होण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.