शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video 
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

हमीदराच्या अल्पवाढीमुळे कपाशी पेरणीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 11:47 AM

Agriculture News : शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत शेतमालास मिळणारे अत्यल्प दर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवत आहे. यानंतरही केंद्र शासनाने कापसाला २०० रुपयांचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असून, कपाशीच्या पेरणीत घट येणार आहे.   बुलडाणा जिल्ह्यात कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीन सोबतच शेतकरी कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. मात्र, शेतमालास खर्चावर आधारित दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले आहे. अलीकडच्या काळात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. या अळीला नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये किमतीच्या फवारण्या कराव्या लागतात. यानंतरही अळीनियंत्रणाखाली येत नाही. खताच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ८०० रुपये किमतीचे खताचे पोते आता १२०० रुपयांवर गेले आहेत. मजुरीचे दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत. डिझेलच्या किमती ९२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. यामुळे मशागतीचे दर वाढले आहेत. कीटकनाशकांच्या किमती आवाक्याबाहेर आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलही कापसाचे उत्पादन होणे अवघड झाले आहे. 

एका एकराला ३० हजार खर्च; उत्पन्न १५ हजार एक एकरासाठी ३० हजारांचा खर्च येतो. मात्र, उत्पन्न १२ ते १५ हजारांचेच होत आहे. शेतकऱ्यांना १५ हजारांच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. कापसाचे उत्पादन आणि मिळणाऱ्या दरात कुठलाच ताळमेळ नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन सोडले आहे. 

उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हमी दरातही त्यानुसार वाढ व्हायला हवी. उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी शेती व्यवसायाची अवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत शेतमालाला खर्चावर आधारित दर मिळालेच नाही.- सुनील जाधव, वडगा पाटण, जळगाव जामोद 

टॅग्स :agricultureशेतीkhamgaonखामगावFarmerशेतकरी