शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

पावसाळ्यातही पाण्यासाठी 'झुंज', बुलडाण्यातील सहा तालुक्यांत पाणीटंचाई कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 00:20 IST

शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे.

- योगेश फरपटखामगाव : शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे. घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये पावसाळा लागला तरी पाण्यासाठी भटकंती कायम आहे.बहुतांश गावातील जलपातळी घटली आहे. त्यामुळे चांगला पाऊस झाल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणे कठीण आहे. शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. येथील बोअरवेल व विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. गावात टँकर कधी येईल, याची नागरिक चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेले असतात. गावात टँकर आले की, महिला, पुरुष, मुले, मुली टँकरवर पाणी भरण्यासाठी तुटून पडताना दिसतात. यावर्षी सुद्धा दोन टँकर येथे सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना न केल्याने नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. या गावची लोकसंख्या ५००० आहे. गावातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील वर्षात तरी येथील पाणीप्रश्न कायमचा निकाली लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

कायमस्वरुपी उपाययोजनांकडे दुर्लक्षचगावात काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो, याची जाणीव प्रशासनाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कित्येकदा प्रशासनाला निवेदन दिले. आंदोलने केलीत. मात्र गंभीरतेने याची दखल कुणीच घ्यायला तयार नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Waterपाणी