शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

पाण्याअभावी दसरखेड 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 1:31 PM

पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

  - मनोज पाटीलमलकापूर :  मलकापूर तालुक्यात पाणी टंचाईचे सावट असून, पाण्याअभावी दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील 'एमआयडीसीती'ल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  

          वाढत्या तापमानामुळे जलसाठयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत चालले आहे. मानवी जिवा सोबतच जनावरांनाही पाणी टंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. अशा पाणी- बाणी च्या परिस्थितीत एमआयडीसीतील उद्योग धंदे सुध्दा बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहेत. 

           एमआयडीसी परिक्षेत्रात सद्यस्थितीत 25 ते 27 उद्योग सुरू असुन  यामध्ये सर्वाधिक पाण्याची गरज ही पुठठा  कारखाना, केमिकल कंपनी व बिर्ला  काॅटसीन आदी कंपन्यांना पडते. त्यामध्ये 7 क्राफ्ट पेपर व पेपर मिल, 3 केमिकल तर 1 टेक्स्टाईल्स कंपनी आहे. या कंपन्यांच्या  संपूर्ण उत्पादनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. 

          पूर्णा  नदी पात्रातुन वाघोळा सबस्टेशन वरील जॅकवेल अंतर्गत या कंपन्यांना पाणी पुरवठा होत असतो. परंतु सद्यस्थितीत या उद्योगांना पाणी टंचाई ची चांगलीच झळ बसू लागली आहे. 15 दिवसाआधी वाघोळा सब स्टेशन वरील जॅकवेल मध्ये 11 टक्के पाणी होते. तर आठ दिवस आधी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने येथील पाणी पुढे तापी नदीच्या पात्रात वाहून गेले.

           सद्यस्थितीत येथे केवळ 2 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. केवळ हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे या जलसाठ्यातील जल अत्यंत कमी झाले. त्यामुळे उपलब्ध असलेल्या 2 टक्के पाण्यावर आता उद्योग कसा करायचा हा मोठा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर ठाण मांडून बसला आहे. तर उद्योग बंद पडल्यास या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 2 हजार कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

             उद्योग बंद पडले तर शासनाचेही जीएसटी कराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सह जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाने सुध्दा तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापर्यंत किमान आता तरी हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्या जाऊ नये. त्याचप्रमाणे एमआयडीसी चे पंपिंग जॅकवेल समोरून पुढे दोन किमी अंतरावर पाणी अडविणे करिता कोल्हापुरी बंधारा बांधल्या जाणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.

             जेणेकरून येथे पावसाळ्यातील पाणी साठवून पाण्याची पातळी जैसे थे राहण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे अशा पाणी-बाणीच्या परिस्थितीत उद्योग सुरू राहण्याकरिता प्रत्येक उद्योजकाला प्रशासनाने त्या -त्या कंपनीत बोअर करण्याची परवानगी देणे आवश्यक झाले आहे किंबहुना तशी मागणीसुद्धा उद्योजकांकडून समोर येऊ लागली आहे . 

  यापुढे किमान उन्हाळाभर तरी हातनूर चे दरवाजे उघडल्या जाऊ नये जेणेकरून उपलब्ध असलेला पाणीसाठा तरी जैसे थे राहील. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता शासन प्रशासनाकडून त्यादृष्टीने कायमस्वरूपी उपाय योजनांची येथे नितांत झाली आहे.

- शेखर धरणगावकर, सचिव, एमआयडीसी असोसिएशन, दसरखेड 

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी