शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

चार वर्षानंतर प्रथमच १.२३ लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:26 IST

चार वर्षानंतर प्रथमच एक लाख २३ हजार ३६६ शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्ग आणि बिघडलेले अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर यंदा तब्बल चार वर्षानंतर प्रथमच एक लाख २३ हजार ३६६ शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या सहा वर्षाच्या पीक कर्ज वाटपाच्या टक्केवारीचा हा तिसरा उच्चांक आहे. त्यामुळे कोरोनामुळे अर्थकारण डळमळीत झालेल्या कृषी क्षेत्राला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.खरीप हंगामातील पीक कर्ज अद्यापही वाटप सुरू असून येत्या काळात यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसे सप्टेंबर अखेर पर्यंत साधारणत: शेतकºयांना पीक कर्ज वाटप सुरू असते. वास्तविक कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप पीक कर्ज वाटप अडथळ््यांची शर्यत मानली जात होती. कृषी क्षेत्राला उभारी देण्याच्या दृष्टीने यंदा खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ गाठण्यासाठी बँकींग क्षेत्रासमोर आव्हान उभे ठाकले होते. त्यातच शेतकरी कर्जमाफीमुळे यंदा जिल्ह्यात तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना दोन हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ होते. त्यापैकी प्रत्यक्षात पीक कर्जासाठी एक लाख ९३ हजार ९४४ शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात एक लाख २३ हजार ३६६ शेतकºयांना ९८३ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे, की जे २०१६-१७ नंतरचे उच्चांकी पीक कर्ज वाटप आहे. दरम्यान, यात येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.वार्षिक पतआराखड्याच्या जवळपास ७० टक्के तरतूद ही केवळ पीक कर्जासाठी केलेली असते बुलडाण्याचे अर्थकारणही हे शेतीवरच अवलंबून असते. त्यामुळे ही एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल.आॅगस्ट अखेर पर्यंत ही टक्केवारी ७० टक्क्यांच्याही पुढे जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली असून रब्बी हंगामातही शेतकºयांना प्राधान्याने कर्ज देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मंत्र्यांना घ्यावा लागल्या होत्या बैठकाबुलडाणा जिल्ह्यासोबतच अमरावती विभागातील पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढविण्यासाठी यापूर्वी राज्यमंत्री, कृषी मंत्र्यांना बैठका घेवून ताकीद द्यावी लागली होती. मात्र गेल्या वर्षी पर्यंत हा टक्का २६ ते ३१ टक्क्यांच्या पुढे सरकला नव्हता. मात्र यंदा पात्र शेतकºयांपैकी ६४ टक्के शेतकºयांना आतापर्यंत पीक कर्जाचे वाटप झाले आहे, हे ही नसे थोडके. गेल्या सरकारमधील कृषी राज्यमंत्र्यांनी तर ठरावीक कालावधीनंतर कर्जवाटपाच्या स्थितीचा अहवालच पाठविण्याचे यंत्रणेला निर्देश दिले होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीbuldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्ज