शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

एका महिन्यातच शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:27 AM

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत. 

ठळक मुद्देसरपंच पाटील यांच्या प्रयत्नातून लिहा बु. हगणदरीमुक्तीच्या वाटेवर! इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या कामास वेग येण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी सरसावले आहेत. मोताळा तालुक्यातील लिहा बु. या गावाच्या सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन आपले गाव हगणदरीमुक्तीच्या वाटेवर नेले आहे. ऑगस्टमध्ये या गावाने शंभर शौचालयांचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बेसलाइन सर्व्हेप्रमाणे ४१९ कुटुंबांचे हे मोठे गाव असतानाही गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांची एक मोट बांधून काम करीत आहेत.  अजूनही लोकांना शौचालयाचे महत्त्व पटवून सांगावे लागते, ही शोकांतिकाच आहे; परंतु सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील यांच्यासारख्या पदाधिकार्‍यांनी ठरवल्यास  हे काम अशक्य नाही. स्वच्छता हा ग्रामविकासाचा कणा आहे, हे ओळखून सरपंचांनी यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. त्यामध्ये लाभार्थींच्या गृहभेटी घेणे, बैठका घेणे,  तसेच गावातील सकारात्मक विचारांच्या लोकांना एकत्र करून या कामास गती देत आहेत. ४१९ कुटुंबांचे  हे मोठे गाव आहे. अद्याप २५४ एवढे शौचालये त्यांनी पूर्ण केले असून, ऑगस्टमध्ये शंभर या विक्रमी संख्येने त्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून घेतले. अजून त्यांच्याकडे १५४  शौचालये बांधकाम बाकी असून, येत्या महिनाभरात ते पूर्ण करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. यासाठी त्यांना ग्रामसेवक शीतल गवळी यांचे विशेष सहकार्य लाभत असून, ईश्‍वर पाटील, अनिल हरगड, गजानन सपकाळ, यांचाही सक्रिय  सहभाग लाभत आहे. तसेच गावाच्या तलाठी मंदा राठोड यांचाही मोलाचा सहभाग लाभत आहे. इतर सरपंचांनीही यांचा आदर्श घ्यावा, असे आदर्शवत सरपंच सुरेखा ईश्‍वर पाटील या स्वच्छ भारत मिशनसाठी काम करीत आहेत. लवकरच त्या गाव हगणदरीमुक्त करून एक आदर्श निर्माण करतील, याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

इतर गावांनी आदर्श घेण्याची गरजमोताळा तालुक्यातील लिहा बु. येथील ग्रामस्थांनी एका महिन्यात शंभर शौचालयांचे बांधकाम करण्याचा विक्रम केल्यामुळे परिसरात हगणदरीमुक्त गावाची चळवळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लिहा बु. गावाचे सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्यातील इतर गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपले गाव हगणदरीमुक्त करून आदर्श गाव निर्माण करण्याचा चळवळीत भाग घेण्याची गरज आहे.