शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

शेतमाल खरेदी संदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 7:12 PM

शेतमाल खरेदीवरील बाजार समित्यांचे नियंत्रण संपुष्टात आणणारा अध्यादेश जारी करण्यात आल्याने शेतमाल खेरदी संदर्भात व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतमाल खरेदीवरील बाजार समित्यांचे नियंत्रण संपुष्टात आणणारा अध्यादेश जारी करण्यात आल्याने शेतमाल खेरदी संदर्भात व्यापारी, शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना याचे फायदे-तोटे स्पष्ट होतील, असा अंदाज बाजार समितीशी संबंधितांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बाजार समित्यांसह शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून अनुषंगीक विषयान्वये बाजार समित्यांना १२ आॅगस्ट रोजी एक पत्रही पाठविणत आले आहे. मात्र या अध्यादेशाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर नेमकी स्पष्टता येईल, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले.दुसरीकडे अद्याप अनेक शेतकºयांना हा नेमका अध्यादेश काय आहे? हेच माहिती नसल्याचे समोर आले तर अनेकांनी बाजार समित्यांचा सेस यामुळे संपुष्टात येईल व बाजार समित्यांची आर्थिक स्थिती खस्ता होईल, असा अंदाज व्यक्त केला. दुसरीकडे व्यापाºयांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका व्यापाºयाने मालामागे ६० रुपये बाजार समितीला मिळतात ते बंद होतील शेतकºयाचा माल थेट बांधावरच खरेदी केला जावून त्याचा फायदा होईल, आजकाल आॅनलाईन बाजार भाव दिसतात. त्यामुळे शेतकºयांचा यात फायदा आहे, असे सांगितले. दुसरीकडे बाजार समित्या शेतकरी हितासाठी निर्माण करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात शेतकºयाला काय लाभ झाला हा संशोधनाचा विषय आहे. ई-नाम सारखी योजना असूनही शेतकºयाच्या प्रत्यक्ष पदरात किती लाभ पडला असा प्रश्नही एका कर्मचाºयाने उपस्थित केला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी