शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

बुलडाणा बनतोय ‘टँकर वाडा’; २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 3:19 PM

बुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या पाच वर्षातील तिसरा तीव्र दुष्काळ अनुभवणार्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल होत असून मे महिन्याच्या मध्यावरच २११ गावात २२१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे वास्तव आहे. दरम्यान, भूजल पातळी दोन मिटरने खालावली असतानाच प्रकल्पांमधील जलसाठ्यातही अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक राहला आहे. परिणामस्वरुप ‘पाणी हरपल; रान करपल’ अशी काहीसी स्थिती जिल्ह्याची झाली आहे.शनिवारी आॅडीओ ब्रीजच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील निवडक सरपंच आणि ग्रामसेवकांसह अधिकारी वर्गाशी टंचाईच्या मुद्द्यावर संवाद साधणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाईची माहिती घेतली असता ही बाब प्रकर्षाने समोर आली. अवघ्या ११ दिवसात टँकरची संख्या तब्बल ४५ ने वाढून २२१ वर पोहोचली आहे तर १७१ वरून तहाणेने व्याकूळ झालेल्या गावांची संघ्या २११ पोहोचली आहे. त्यावरून मे अखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता कुठले स्वरुप धारण करेल याची कल्पना यावी.वर्तमान स्थितीतच जिल्ह्यातील १२७२ आबाद गावांपैकी १७ टक्के अर्थात २११ गावांची तहान ही टँकरवर भागविल्या जात असून ५७४ गावांची भिस्त ही विहीर अधिग्रहणावर आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५ टक्के गावांमध्ये विहीर अधिग्रहीत कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे मे महिन्या अखेर जिल्ह्यातील तब्बल ७२ टक्के गावांची तहाण ही अधिग्रहीत विहीरीवर अवलंबून राहणार आहे. येत्या काळात ९१६ गावांमध्ये विहीर अधिग्रहण करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन यंत्रणेने केले असून टंचाई कृती आराखड्यात अनुषंगीक बाबी प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड दशकातील जिल्ह्यात पडलेला हा दुष्काळ तीव्र स्वरुपाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी एक हजार १२३ गावात दोन हजार ६१७ उपाययोजा प्रस्तावीत असून त्यापैकी प्रत्यक्षात ६८५ गावात एक हजार १०२ उपाययोजना पूर्णत्वास गेल्या आहेत. यावर १९ कोटी ७४ लाख २४ हजार रुपयांचा आतापर्यंत खर्च झालेला आहे.दुसरीकडे जिल्ह्याची भूजल पातळी ही जवळपास दोन मीटरने खालावली आहे. जिल्ह्याचा भूजल दुष्काळ निर्देशांकही उणे ११ च्या आसपास पोहोचला आहे. वरकरणी तो तुलनेने कमी असला तरी दहा वर्षाच्या सरासरीच्या आधारावर तो काढण्यात येत असतो. त्यामुळे मध्यंतरी अपघाव पद्धतीने पडलेल्या पावसामुळे हा निर्देशांक कमी दिसतो आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टंचाईची स्थिती गंभीर बनत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात दुष्काळ जाहीर झालेला आहे.५५ प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांची संख्या एकूण ९१ आहे. या पैकी ५५ लघु प्रकल्प आजच कोरडे पडलेले आहे तर मोठे व मध्यम प्रकल्पापैकी चार प्रकल्प मृत जलसाठ्यात गेले आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजघडीला प्रत्यक्षात अवघा ४.४७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हा जलसाठाही किती दिवस पुरेल हा प्रश्नच आहे. परिणामी यंदा मान्सून वेळेत न आल्यास जून अखेरच टंचाईची दाहकता जिल्ह्यात भीषण स्वरुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई