बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 02:31 PM2019-08-03T14:31:39+5:302019-08-03T14:32:03+5:30

गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे

In the Buldana district, flood water caused the loss of one and half thousand hectares of land | बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

बुलडाणा जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे दीड हजार हेक्टर जमीन खरडली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या वर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात यंदा पावसाची संतधार सुरू असून गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एक हजार ६३० हेक्टरवरली जमीन पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्याचे वास्तव आता समोर येत आहे. महसूल विभागाकडून यासंदर्भातील सर्व्हेक्षण करण्यात येत असून त्यातंर्गत बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्यात हे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिन्याच्या मध्यावर पडलेल्या पावसादरम्यान हे नुकसान झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात २३ जून नंतर खºया अर्थाने पावसाने जोर पकडला असून जुलै महिन्यातही पावसाने सातत्यपूर्ण हजेरी जिल्ह्यात लावली आहे. दरम्यान, पुरामुळे जिल्ह्यातील जवळपास ७० गावांना गेल्या काही कालावधीत फटका बसलेला आहे. या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या सततच्या पुरामुळे बुलडाणा तालुक्यातील सातही मंडळामध्ये मोठे नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाची आकडेवारी स्पष्ट करते. या प्रकरणी प्रशासनाने त्वरेने नुकसानाच्या सर्व्हेक्षणाचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने महसूल विभागाकडून सध्या हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाला बुलडाणा, चिखली व मोताळा तालुक्याचे अहवाल प्राप्त झाल आहे. अन्य तालुक्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. प्राप्त अहवालांच्या आधारावर वर्तमान स्थितीत पाच हजार ९०७ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडत असतो दोन आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३६९ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तो ५५.२६ टक्के आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत जिल्ह्यातील ९० मंडळांपैकी २२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
 
बुलडाण्यात सर्वाधिक नुकसान
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सातही महसूल मंडळामध्ये त्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या मध्ये एक हजार ५७० हेक्टरवरील जमीन खरडून गेली आहे. दरम्यान फळबागांसह अन्य पिकांचे असे एकूण एक हजार ६१७ हेक्टरवरील नुकसान झाल्याचे सर्व्हेक्षणाचा अहवाल सांगतो. दरम्यन, चिखली तालुक्यात १२ हेक्टर तर मोताळा तालुक्यात ११ हेक्टर असे एकूण एक हजार ६५० हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजार ९०७ शेतकरी प्रभावीत झालेले आहेत. यामध्ये काही शेतकºयांचे नुकसान हे ३३ टक्क्यांच्या आतील आहे. मात्र अशा शेतकºयांची संख्या प्रामुख्याने मोताळा तालुक्यातील आहे.


४१६ विहीरी खचल्या
 अतिवृष्टीमुळे बुलडाणा आणि चिखली तालुक्यातील तब्बल ४१६ विहीरी खचल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकट्या बुलडाणा तालुक्यातील ३८६ विहीरी खचल्या आहेत तर चिखली तालुक्यातील ३० विहीरी खचल्याचे तहसिल कार्यालयाने पाठवलेल्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे रब्बी हगांमात या शेतकºयांना प्रसंगी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकट्या देऊळघाट सर्कलमधील १६९ विहीरींचे जून महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे तर पाडळी आणि धाड सर्कलमधील अनुक्रमे ६६ आणि ५२ विहीरी खचल्या आहेत. बुलडाणा सर्कलमध्ये ११, साखळी बुद्रूक सर्कलमध्ये ३८, रायपूर सर्कलमध्ये ३५ आणि म्हसला बुद्रूक सर्कलमध्ये १५ विहीरी खचल्या आहेत.
१९ मंडळामध्ये अतिवृष्टी

पावसाळ््याच्या गेल्या दोन महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील ९० मंडळापैकी १९ मंडळामध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाल्याची नोंद असून यामध्ये धाड, लोणी आणि डोणगाव या मंडळामध्ये प्रत्येकी दोनदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. जामोद, संग्रामपूर, पातुर्डा, चिखली, अमडापूर, हातणी, चांधई, पाडळी, म्हसला, अंढेरा, हिवरा, देऊळगाव, अंजनी, नायगाव, टिटवी, बोराखेडी या महसूल मंडळामध्ये प्रत्येकी एकदा ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

Web Title: In the Buldana district, flood water caused the loss of one and half thousand hectares of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.