शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
2
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
3
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
4
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
5
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
6
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
7
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
8
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
9
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
10
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
11
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
12
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
13
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
14
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
15
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
16
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:23 IST

या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे.

विश्वास पाटीलजलंब (जि. बुलडाणा) : भाजपने सोशल मीडियावर उभी केलेली बदनामीकारक प्रतिमा ते आता सर्वसामान्यांना आश्वासक वाटणारा नेता असे प्रतिमा संवर्धन हेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मोठे फलित असल्याचे चित्र या यात्रेत सहभागी झाल्यानंतर जाणवले.ही यात्रा जशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे, तशीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील स्पेसलाही बळ देणारी आहे. सगळेच काही वाहून गेलेले नाही... विरोधात कोणी तरी उभा राहत आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यात यात्रा कमालीची यशस्वी होत असल्याचे दिसले.यात्रा रोज सकाळी सहा वाजता सुरू होते. शेगावला शनिवारी जेव्हा ती सुरू झाली तेव्हा मार्केट यार्डसमोरील रस्ता लोकांनी फुलला होता. पहाटेची बोचरी थंडी होती, परंतु लोकांचा उत्साह त्या थंडीला मागे सारणारा होता. त्यादिवशी इंदिरा गांधींची जयंती असल्याने महिलांना यात्रेत प्राधान्य देण्यात येणार होते. त्यामुळे अर्थातच महिलांची संख्याही लक्षणीय होती.सकाळी राष्ट्रगीत झाले आणि राहुल गांधी झपाझप पावले टाकत चालू लागले. जो मार्ग होता तो तसा आडवळणाचा होता. शेतवडीतून जाणारा... दोन्ही बाजूला कापूस, तुरीचे पीक होते. गावागावांमधील वातावरण भारावून टाकणारे होते. लोकांनी दारात रांगोळ्या काढल्या होत्या. महिला आरती घेऊन ओवाळत होत्या. अनेक घरांच्या गच्चीवरून लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करताना दिसले. ‘नफरत छोडो... भारत जोडो’चा नारा आसमंतात घुमत होता. यात्रेत सहभागी झालेले लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले... गाड्या भरून आणलेले भाडोत्री कार्यकर्ते त्यात कुठेच नव्हते.कोणी तरी आपल्या जीवनातील दु:ख, अडचणी कमी करण्यासाठी चार पावले चालत आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे हीच भावना सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शाळकरी मुले-मुली वेशीवर थांबून ‘नफरत छोडो... भारत जोडो’ अशा घोषणा मुठी आवळून देत होती. हे चित्र फार आशादायी होते. जलंबमध्ये एक शेतकरी भेटले. ते सांगत होते, ‘पंतप्रधान होण्याची लायकी असणारा माणूस आमच्या गावात आला आहे. त्याच्या पायाला आमच्या गावची माती लागत आहे हे आमच्या गावचे भाग्य आहे. म्हणूनच सारा गाव यात्रेच्या स्वागतासाठी गेले तीन दिवस झटत आहे.’ यात्रेच्या मार्गावरील हे प्रातिनिधीक चित्र होते.या यात्रेत समाजाच्या सर्वच स्तरांतील लोक दिसत होते. काँग्रेस कार्यकर्त्यापासून ते साहित्यिक, पर्यावरणप्रेमी, समाजवादी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, डाव्या चळवळीतील आणखी बरेच कोणी... दलित, मुस्लीम, महिला, विद्यार्थी, कामगार ते शेतकरी असेही बरेच समाजघटक त्यात चालताना दिसले. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ते पंचाहत्तरी पार केलेल्या व्यक्तींपर्यंत लोक व्यक्तिगत आजारपण, प्रश्न, अडचणी बाजूला ठेवून या यात्रेत बदलाच्या आशेने सहभागी होत आहेत.राहुल गांधी यातील अनेकांना शांतपणे भेटताना दिसले. लोकांशी संवाद साधताना, त्यांचे प्रश्न, भावना जाणून घेत होते. भारत जाणून घेण्यासाठीची धडपड त्यातून प्रतित होत होती. सुरक्षा यंत्रणांचा गराडा असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी आटापिटा करत होते.

नव्या बदलाची पायाभरणीच...या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे. परंतु, भाजप व मोदी यांच्या विरोधातील नेतृत्व म्हणून लोक त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्या अंगाने त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकार घेत असल्याचे चित्र यात्रेतील अनुभवातून ठळक झाले. भारत जोडण्याची ही यात्रा मुख्यत: माणूस जोडण्याची यात्रा आहे. दुभंगलेला समाज जोडण्याची यात्रा आहे, असाच माहौल यात्रेत दिसत आहे. लोकांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाटणे ही देशाच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने नव्या बदलाची पायाभरणीच म्हणायला हवी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkolhapurकोल्हापूरRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा