शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 17:23 IST

या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे.

विश्वास पाटीलजलंब (जि. बुलडाणा) : भाजपने सोशल मीडियावर उभी केलेली बदनामीकारक प्रतिमा ते आता सर्वसामान्यांना आश्वासक वाटणारा नेता असे प्रतिमा संवर्धन हेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मोठे फलित असल्याचे चित्र या यात्रेत सहभागी झाल्यानंतर जाणवले.ही यात्रा जशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे, तशीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील स्पेसलाही बळ देणारी आहे. सगळेच काही वाहून गेलेले नाही... विरोधात कोणी तरी उभा राहत आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यात यात्रा कमालीची यशस्वी होत असल्याचे दिसले.यात्रा रोज सकाळी सहा वाजता सुरू होते. शेगावला शनिवारी जेव्हा ती सुरू झाली तेव्हा मार्केट यार्डसमोरील रस्ता लोकांनी फुलला होता. पहाटेची बोचरी थंडी होती, परंतु लोकांचा उत्साह त्या थंडीला मागे सारणारा होता. त्यादिवशी इंदिरा गांधींची जयंती असल्याने महिलांना यात्रेत प्राधान्य देण्यात येणार होते. त्यामुळे अर्थातच महिलांची संख्याही लक्षणीय होती.सकाळी राष्ट्रगीत झाले आणि राहुल गांधी झपाझप पावले टाकत चालू लागले. जो मार्ग होता तो तसा आडवळणाचा होता. शेतवडीतून जाणारा... दोन्ही बाजूला कापूस, तुरीचे पीक होते. गावागावांमधील वातावरण भारावून टाकणारे होते. लोकांनी दारात रांगोळ्या काढल्या होत्या. महिला आरती घेऊन ओवाळत होत्या. अनेक घरांच्या गच्चीवरून लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करताना दिसले. ‘नफरत छोडो... भारत जोडो’चा नारा आसमंतात घुमत होता. यात्रेत सहभागी झालेले लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले... गाड्या भरून आणलेले भाडोत्री कार्यकर्ते त्यात कुठेच नव्हते.कोणी तरी आपल्या जीवनातील दु:ख, अडचणी कमी करण्यासाठी चार पावले चालत आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे हीच भावना सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शाळकरी मुले-मुली वेशीवर थांबून ‘नफरत छोडो... भारत जोडो’ अशा घोषणा मुठी आवळून देत होती. हे चित्र फार आशादायी होते. जलंबमध्ये एक शेतकरी भेटले. ते सांगत होते, ‘पंतप्रधान होण्याची लायकी असणारा माणूस आमच्या गावात आला आहे. त्याच्या पायाला आमच्या गावची माती लागत आहे हे आमच्या गावचे भाग्य आहे. म्हणूनच सारा गाव यात्रेच्या स्वागतासाठी गेले तीन दिवस झटत आहे.’ यात्रेच्या मार्गावरील हे प्रातिनिधीक चित्र होते.या यात्रेत समाजाच्या सर्वच स्तरांतील लोक दिसत होते. काँग्रेस कार्यकर्त्यापासून ते साहित्यिक, पर्यावरणप्रेमी, समाजवादी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, डाव्या चळवळीतील आणखी बरेच कोणी... दलित, मुस्लीम, महिला, विद्यार्थी, कामगार ते शेतकरी असेही बरेच समाजघटक त्यात चालताना दिसले. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ते पंचाहत्तरी पार केलेल्या व्यक्तींपर्यंत लोक व्यक्तिगत आजारपण, प्रश्न, अडचणी बाजूला ठेवून या यात्रेत बदलाच्या आशेने सहभागी होत आहेत.राहुल गांधी यातील अनेकांना शांतपणे भेटताना दिसले. लोकांशी संवाद साधताना, त्यांचे प्रश्न, भावना जाणून घेत होते. भारत जाणून घेण्यासाठीची धडपड त्यातून प्रतित होत होती. सुरक्षा यंत्रणांचा गराडा असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी आटापिटा करत होते.

नव्या बदलाची पायाभरणीच...या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे. परंतु, भाजप व मोदी यांच्या विरोधातील नेतृत्व म्हणून लोक त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्या अंगाने त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकार घेत असल्याचे चित्र यात्रेतील अनुभवातून ठळक झाले. भारत जोडण्याची ही यात्रा मुख्यत: माणूस जोडण्याची यात्रा आहे. दुभंगलेला समाज जोडण्याची यात्रा आहे, असाच माहौल यात्रेत दिसत आहे. लोकांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाटणे ही देशाच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने नव्या बदलाची पायाभरणीच म्हणायला हवी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkolhapurकोल्हापूरRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा