शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

Bharat Jodo Yatra: रस्त्यावर उतरा, लोकांचा आवाज ऐका; मग कळेल द्वेष, भीती कुठेय! संतनगरी शेगावातील प्रचंड सभेत राहुल गांधी यांचा विरोधकांना सल्ला

By किरण अग्रवाल | Updated: November 19, 2022 08:28 IST

Rahul Gandhi: द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेगावमध्ये झालेल्या प्रचंड सभेत विरोधकांना दिला.

- किरण अग्रवाल/राजेश शेगोकार शेगाव : द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेगावमध्ये झालेल्या प्रचंड सभेत विरोधकांना दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भाने महाराष्ट्रात वाद उपस्थित झाला असताना या वादावर भाष्य करणे टाळत त्यांनी इतर मुद्द्यांवर भर दिला. भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील अखेरची सभा शुक्रवारी संतनगरी शेगावात पार पडली. लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी ‘संत गजानन महाराज की जय’ अशी सुरूवात करत यात्रेतील आतापर्यंतचे अनुभव सांगितले. यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या टिप्पणीनंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच हा  विषय टाळत त्यांनी ‘नफरत छोडो’ याच मुद्द्याभोवती संवाद साधला.    शेतकरी आत्महत्या करतो. त्यांच्या डोक्यावर कर्ज असते. परंतु, ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे मनापासून ऐकले तर त्यांना शेतकऱ्यांची व्यथा कळेल. त्यांना मदत करता येईल.

‘संत गजानन महाराज की जय’ अशी भाषणाची सुरुवात... म्हणालेअसह्य परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून त्यांचे कर्ज माफ करत नाहीत. माेठ्या उद्याेगपतींचे अब्जावधी रुपये माफ केले जात आहेत.मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलो. भाजपने घराघरांत भांडणे लावली. ज्या घरांमध्ये द्वेष असताे,  भांडणं असतात, त्या घराचे नुकसान हाेते. मग देशात भांडणे लावली तर देशाचा फायदा हाेईल का.

संत परंपरेेने प्रेम शिकविले महाराष्ट्रातील संतांच्या नावांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी संतपरंपरेचा गाैरव केला. या सर्व संतांनी प्रेमाचा संदेश दिला. हाच संदेश घेऊन भारत जाेडाे यात्रा निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत. ते छत्रपती झाले; कारण त्यांनी लाेकांचा आवाज ऐकला. ते  महाराष्ट्राचा आवाज आहेत. त्यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले, हे आपणास विसरून चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी छत्रपतींचे स्मरण केले.   मान्यवरांची मांदियाळी...  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी एच. के. पटेल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळातील पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, कन्हैया कुमार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, भाई जगताप, यशोमती ठाकूर, आ. सुधीर तांबे, आ. कुणाल पाटील, आ. विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. अमित देशमुख, आ. सतेज पाटील, आ. हिरामण खोसकर, रजनी पाटील, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे डॉ. राजेश टोपे, अरुण गुजराथी, आ. एकनाथ खडसे, फौजिया खान, डॉ. कैलास कमोद, शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर, आदींची मुख्य व्यासपीठावर उपस्थिती होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसbuldhanaबुलडाणा