शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

प्रोत्साहन अनुदानाचा साडेचार हजार शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:08 IST

  बुलडाणा : शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाची पूर्णत: फेड केलेल्या व २०१६-१७ मधील घेतलेल्या कर्जाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परफेड केली अशा बुलडाणा जिल्ह्यातील चार हजार ६५८ शेतकर्यांना राज्य शासनाने आठ कोटी चार लाख १८ हजार ७२९ रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिल्याची माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षभरात शेतकरी कर्जमाफी संदर्भात नवनवीन परिपत्रक आल्याने तथा प्रत्यक्ष खात्यात पैसा जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे. नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्याची पीक कर्जाची टक्केवारीही अपेक्षीतपणे वेग घेत नसल्याचे चित्र आहे.

  बुलडाणा : शेतकरी कर्जमाफी योजनेतंर्गत २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाची पूर्णत: फेड केलेल्या व २०१६-१७ मधील घेतलेल्या कर्जाची रक्कम ३० जून २०१७ पर्यंत परफेड केली अशा बुलडाणा जिल्ह्यातील चार हजार ६५८ शेतकर्यांना राज्य शासनाने आठ कोटी चार लाख १८ हजार ७२९ रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिल्याची माहिती आता समोर आली आहे. २८ जून रोजी शेतकरी कर्जमाफीची वर्षपूर्ती झाल्याच्या पृष्ठभूमीवर अनुषंगीक माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. मात्र अद्यापही यातील १४५ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालेला नसल्याची वस्तुस्थितीही समोर आली आहे. त्यातच गेल्या वर्षभरात शेतकरी कर्जमाफी संदर्भात नवनवीन परिपत्रक आल्याने तथा प्रत्यक्ष खात्यात पैसा जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे. त्यातच वनटाईम सेटलमेंटमध्ये अडकलेल्या शेतकर्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने जिल्ह्याची पीक कर्जाची टक्केवारीही अपेक्षीतपणे वेग घेत नसल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने २८ जून २०१७ रोजी परिपत्रक काढून राज्यातील एक कोटी ३६ लाख शेतकर्यांंच्या जिव्हाळ््याच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला हात घातला होता. त्यासाठी मोठी तरतूदही केली गेली होती. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातील गुर्हाळ चांगलेच लांबून २०१८ साल उजाडले तरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर कायम आहे. २०१८ ह वर्षे अर्धे अधिक निघून गेले तरी कर्जमाफीचा घोळ मात्र काय आहे. आता सप्टेंबर २०१८ पर्यंत वनटाईम सेटलमेंट (एक रकमी परतफेड) योजनेसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. दुसरीकडे परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या अनुषंगाने आठव्या ग्रीन लिस्टपर्यंत जिल्ह्यातील चार हजार ८०३ शेतकरी हे प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरले होते. मात्र प्रत्यक्षात चार हजार ६५८ शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. ज्या शेतकर्यांनी ३१ जुलै २०१७ पर्यंत त्यांच्या कर्जाची परतफेड केली असा शेतकऱ्यांना त्यांच्या २०१५-१६ या वर्षातील कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी जी रक्कम असेल तरी अनुदान म्हणून देण्यात येणार होती. दरम्यान, १५ हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम असल्यास अशी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना परत देण्यात येणार होती. अशा या योजनेचा प्रत्यक्षात जिल्ह्यातील चार हजार ६५८ शेतकऱ्यांनाच लाभ झाल्याची माहिती आहे. अन्य १४५ शेतकरी अद्यापही याच्या लाभापासून वंचित आहे.

बीडीसीसीच्या एकाही शेतकरी नाही

प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळालेला नाही. आठव्या ग्रीन लिस्टपर्यंत यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतंर्गत पीक कर्ज घेतलेल्या १५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकलेला नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी