शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

कचऱ्याच्या ढिगावर बेलाड वासीयांनी केली दिवाळी साजरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:32 PM

दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मलकापूर : दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.  

मागील दोन महिन्यापासून बेलाड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक असलेलं डम्पिंग ग्राऊंड त्वरित हटविण्यात यावे व झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी लढाई लढत आहे. याकरिता न. प. प्रशासनाला व तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. 

दिवाळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांनी दिवाळी या सणावर बहिष्कार टाकून डंपिंग ग्राउंडवर दिवाळी साजरी केली. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी सुनील  संबारे, श्रीकृष्ण संबारे, इच्छाराम संबारे, राहुल संबारे, दीपक चोखंडे, गणेश दहिभाते, सोमेश्वर संबारे, हनुमान भगत, सागर संबारे, गजानन संबारे, दुर्गेश जंगले, सचिन संबारे, पवन संबारे, अमोल संबारे, मनोज संबारे, गणेश संबारे,अनिल केने, प्रशांत संबारे, निलेश संबारे, शिवाजी केने, अमृत संबारे, रामा संबारे यांनी सहभाग घेतला. 

असा दुजाभाव कशासाठी? 

नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बेलाड कॉटन मार्केट समोर राहणाऱ्या नाथ जोगी समाजाचे लोक यांना वीजपुरवठा व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीमध्ये दिवाळी साजरी केली. परंतु त्या समाजाच्या लोकांसाठी  विद्युत पुरवठा व्हावा हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. डम्पिंग ग्राऊंड हा त्यांच्यासाठी तितकाच गंभीर प्रश्न आहे. नऊ-दहा 2018 ला नगरपरिषद प्रशासनाला डम्पिंग ग्राउंड विरोधात निवेदन देताना नाथ जोगी समाजाचे लोक उपस्थित होते. नाथ जोगी समाजाचे लोक जिथे राहतात त्यांच्या घराच्या 100 मीटर अंतरावरच हे डम्पिंग ग्राऊंड वसवलेलं आहे. नगराध्यक्ष अॅ. हरीश रावळ या प्रकरणाबाबत दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला. 

आरोग्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष! 

भराडी लोकांसह बेलाड ग्रामस्थ व इतर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजार लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही हरीश रावळ गप्प का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आम्हा बेलाड वाशीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसाच्या आत प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीbuldhanaबुलडाणा