शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 17:02 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली.

बुलडाणा - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत कळताच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. भाजपाच्या नेत्यांनी आपले नियोजित दौरे तात्काळ रद्द केले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अबुधाबीवरुन फोन करत जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विशेष म्हणजे जेटलींचे सुपुत्र रोहन यांनी मोदींना त्यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्याचे बजावले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहचली होती. तेथून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, जेटलींना भुसावळ येथे श्रद्धांजली अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी खामगावच्या दिशेने आपली यात्रा सुरू केली. खामगाव येथे पोहोचल्यानंतर फडणवीस यांनी तेथील जमलेल्या जनसुमदायाला संबोधित केले. 

खामगावमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक फडणवीस यांची वाट पाहात होते. येथील व्यासपीठावर गेल्यानंतर फडणवीस यांनी, सर्वप्रथम जेटलींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणाला सुरुवात केली. मात्र, येथील भाषणात फडणवीस यांनी कुठल्याही राजकीय मुद्द्याला किंवा विरोधकांवरांना उद्देशून भाषण केले नाही. केवळ, जेटलींबद्दल, जेटलींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि जेटलींच्या व्यक्तीमत्वाबद्दल फडणवीस यांनी भाषण केले. तसेच, या भाषणानंतर कुठलिही नारेबाजी देण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली होती. एक संवेदनशील नागरिक, कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या नेत्याच्या निधनाने झालेली हानी, लक्षात घेऊन आपल्या संवेदना नेत्याप्रति व्यक्त केल्या पाहिजेत, असे फडणवीस यांनी म्हटले. 

खामगाव येथील भाषणात बोलताना फडणवीस म्हणाले की, येथे जमलेल्या लोकांना भेटणं, त्यांना सद्यपरिस्थितीबद्दल अवगत करणं आणि जेटलींना श्रद्धांजली अर्पण करणं गरजेचं असल्यामुळे मी यात्रा जागेवरच स्थगित न करता खामगावात पोहोचलो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, येथील भाषणाच्या शेवटी त्यांनी आपण आपली महाजनादेश यात्रा दोन दिवसांकरिता रद्द करत असल्याचं सांगितलं. जेटलींच्या अंत्यसंस्कारानंतरच यात्रेच्या पुढील कार्यक्रमास सुरूवात होईल, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, जेटलींच्या निधनानंतरही फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, फडणवीस यांनी तेथील उपस्थित, जमलेल्या नागरिकांच्या भावनांची कदर करत खामगावात येऊन, जेटलींना श्रद्धांजली वाहून आपल्या यात्रेचा समारोप केला.  

पाहा, खामगाव येथील सभेचा व्हिडीओ -

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArun Jaitleyअरूण जेटलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाbuldhanaबुलडाणा