शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

१५ टक्के शेतकऱ्यांनाच रब्बीचे ५० कोटी कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:11 PM

आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.

ठळक मुद्दे बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामात अतिवृष्टीचा फटका सहन करणाºया शेतकºयाना रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असून जमिनीतील जादा ओलही कमी झाल्यामुळे शेतकºयानी रब्बी पेºयासाठी लगबग सुरू केली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी पीक कर्ज देण्याचा वेग आता वाढविण्याची गरज असून आतापर्यंत १५ टक्के शेतकऱ्यांना ४९ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आहे.रब्बी हंगामात पीक कर्जासाठी पात्र असलेल्या शेतकºयांची संख्या ही ३६ हजार ९८३ असून त्यापैकी प्रत्यक्षात पाच हजार ४७० शेतकºयांना आतापर्यंत पीक कर्ज देण्यात आले आहे. २० नोव्हेंबर दरम्यान १२ टक्के शेतकºयांना ३८ कोटी रुपयांच्या आसपास पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. नोव्हेंबर संपता संपता त्यात ११ कोटी ६६ लाख रुपयांची जवळपास भर पडली असली तरी पीक कर्ज वाटपचा वेग वाढविणे सध्या क्रमप्राप्त आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप आणि रब्बी मिळून आतापर्यंत ५८ हजार ८९ शेतकºयांना ४६३ कोटी २३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. एक हजार ९७० कोटी ८६ लाख रुपयांच्या वार्षिक उदिष्टाच्या तुलनेत प्रत्यक्षात २४ टक्केच हे कर्ज वाटप झालेले आहे. खरीप व रब्बीची तुलना करता रब्बी हंगामात तुलनेने पीक कर्ज वाटपाचा वेग वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.दुसरीकडे गेल्या महिन्यातच ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना १३६ कोटी १३ लाख ९१ हजार रुपयांच्या निधी वाटपास मान्यता देण्यात आली होती. हा निधीही जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. दरम्यान यापैकी बहुतांश रक्कम जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात जमा झाली असून रब्बी हंगामातील पेरणीसाठी त्याचा शेतकºयांना लाभ झाला आहे. आता केंद्राकडून प्रत्यक्षात कधी मदत मिळते याची शेतकºयांना प्रतीक्षा आहे. त्यामुळेच शेतकºयांना वर्तमान स्थितीत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची निकड असल्याचे चित्र आहे. १५ डिसेंबर पर्यंत रब्बीचा हंगाम साधारणत: राहतो. त्यामुळे शेतकºयांनी आता पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी रब्बीमध्ये ३३ कोटी ९१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. चार हजार २३८ शेतकºयांना प्रत्यक्षात हे कर्ज मिळाले आहे. खासगी बँकांनी ११ कोटी ९७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्याची टक्केवारी ३२ च्या आसपास जाते. जिल्ह्यातील ग्रामिण बँकांनी तीन कोटी ७६ रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १२.०७ टक्के आहे.खरीपापेक्षा रब्बी पीक कर्ज वाटपाची टक्केवारी अधिक४खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी पाहता रब्बी हंगामात खरीपाच्या तुलनेत जादा पीक कर्जवाटप करण्यात आल्याचे टक्केवारी सांगते खरीपाच्या तुलनेत रब्बीचे उदिष्ट कमी असले तरी त्याचा वाटपाचा वेग तुलनेने अधीक असल्याने ही टक्केवारी जादा आहे. खरीपात एकूण उदिष्ठाच्या २३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले तर रब्बीमध्ये आतापर्यंत एकुण उदिष्ठाच्या २५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या काळात यातमध्ये आणखी वाढ होणार असून फेब्रुवारी पर्यंत पीक कर्ज वाटप केल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी