शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

जगातील २५ टक्के लोकसंख्या मानसिक विकारात राहील- गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 5:37 PM

२०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.

बुलडाणा: क्रुझमधील सुरक्षा रेलींग ओलांडून मिसेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेल्फी काढल्याचा मुद्दा सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल होत असतानाच सेल्फायटिस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डरसारखे आजार आता समोर येत असून २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्येला मानसिक आजार जडेल असे महत्त्वपूर्ण वक्तव्य आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते तंत्रज्ञ, विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर विपूल लेखन करणारे अच्यूत गोडबोले यांनी बुलडाणा येथे केले.बुलडाणा येथे २१ आॅक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने ते बुलडाण्यात आले होते. यावेळी स्थानिक बुलडाणा अर्बन रेसीडेन्सीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सोशल मिडियात वाढता सेल्फीट्रेन्ड, फेसबुक अ‍ॅडिक्ट आणि वतर्ममानस्थितीत भरकटलेला युवक या मुद्यांना धरून त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. वाढता चंगळवाद हा अनेक बाबींसाठी कारणीभूत असून भरकटलेला आजचा युवक, तरुण वर्ग हा आई-वडिलानी आपल्या पाल्यामध्ये मुल्यांची रुजवणूक करणे गरजेचे झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी आणि पैसा यामुळे आजची मुले भरकटू लागली असून दुसर्याशी तुलना केल्याने समस्या निर्माण होत आहे. आपण तंत्रज्ञानाच्या विरोधात नसून ते एक साधन म्हणून उपयुक्त आहे. पाश्चिमात्य संस्कृती आज आपण स्वीकारत आहोत. यूज आणि थ्रो ही संकल्पना आजच्या तरूण पिढीत रुजल्या गेल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातूनच २०२५ पर्यंत जगातील २५ टक्के लोकसंख्या ही मानसिक विकारात राहील, असे वक्तव्य त्यांनी केले.दुसरीकडे दिवसातून किमान तीनदा डीपी बदलणेही मानसिक विकारात मोडते. त्यातून आता नव्याने सेल्फायटीस, फेसबुक अ‍ॅडिक्शन डिसआॅर्डर सारखे आजार समोर येत आहेत. आज सोशल मिडीयाचा वापर थिल्लरपणे चालू आहे. वास्तविक सोशल मिडियाने अनेक चळवळी उभ्या केल्या. ‘मीटू’, जेष्ठ नागरिकांची चळवळ अशा अनेक चळवळी उभ्या राहल्या आहेत. ‘मीटू’ चे संदर्भ आणि अन्वयार्थ काहीसे वेगळे आहेत. मात्र सोशल मिडीयामध्ये ताकद आहे. हे तंत्रज्ञान सकारात्मक दृष्टीकोणातून साधन म्हणून वापरणे योग्य आहे. परंतू त्याच्या अधीन जाणे तितकेसे योग्य नाही, असे ही अच्यूत गोडबोले म्हणाले.‘ईव्हीएम हॅक होऊ शकते पण हियर नाही!’‘ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते पण ते हियर होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही!’ असे वक्तव्य एका प्रश्नाला उत्तर देताना अच्यूत गोडबोले यांनी देऊन पत्रकार परिषदेत हशा पिकविला. लोकशाहीत जर अशा मुद्द्यावरून शंका निर्माण होत असले तर त्या ठिकाणी बॅलेटपेपरवच निवडणूक घेतली जावी. लोकशाहीचा खेळ कशाला. यामध्ये आपण सत्ताधारी पक्षाला दोष देत नाही. विरोधक त्या मुद्द्यावर बोंब मारताहेत. अशा मुद्द्यांशी आपल्याला घेणे नाही. तसेच मिळणारी मते ही एका विशिष्ट पक्षालाच मिळताहेत याबाबतही अपाण सांगू शकत नाही. मात्र जेथे शंका आहे तेथे कशाला खेळ, असे ते म्हणाले.निश्चलीकरण योग्य पण घाईत घेतलेला निर्णयनोटबंदीचा( निश्चलीकरण) घेतलेला निर्णय अथवा कल्पना योग्य आहे. परंतू तो निर्णय घाईघाईत घेतला गेला. नोटांमध्ये ६.८ टक्के पैसा हा काळा पैसा आहे. बाकी काळा पैसा हा प्रॉपर्टी, सोने आणि परदेशात आहे. हजाराची नोट बंद करून दोन हजाराची काढणे तर्कसंगत वाटत नाही. त्यापेक्षा हजाराची नोट बंद करून त्याजागी तेवढ्याच मुल्ल्याच्या ५०० रुपयांचा अतिरिक्त नोटा आणल्या गेल्या असत्या तर अधिक बरे झाले असते. एटीएममधील सॉफ्टवेअरमध्ये जुजबी बदल करून ते फिटअप करता आल्या असत्या. रांगेमध्येही त्यामुळे उभे राहण्याचे काम नव्हते, असे गोडबोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य