शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचारी आता ‘नजर’ कैदेत

By admin | Updated: February 9, 2015 23:07 IST

जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी

भंडारा : जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेरातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल.जिल्हा परिषदेतील कर्मचारी सकाळी कर्तव्यावर आल्यानंतर सायंकाळी ५.४५ पर्यंत कार्यालयात हजर राहून कर्तव्य पार पाडणे गरजे आहे. दरम्यान त्यांना दुपारी २ वाजता अर्धा तासाचा 'लंच ब्रेक' दिल्या जातो. मात्र, अनेक कर्मचारी वेळेचा दुरूपयोग करताना आढळून येत होते. यामुळे कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या नारिकांना कर्मचारी टेबलवर दिसून येत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होत होता. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी इमारतीच्या तळमजल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वगळता उर्वरीत तीन चॅनल गेट सकाळी १०.३० वाजेपासून कार्यालयीन वेळ होईपर्यंत बंद ठेवण्यात येतात.यानंतरही कर्मचाऱ्यांचे टेबल सोडून जाण्याचा उपक्रम सुरूच असल्याने मुख्य प्रवेशद्वारावर एक कर्मचारी बसवून बाहेर जाणाऱ्यांची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे. आता कर्मचाऱ्याची कर्तव्यात किती पारदर्शक आहेत. याची माहिती व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी चौदा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. यात आणखी वाढ करण्यात आली असून सात नवीन कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. हे कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, व्हरांड्यात तथा काही महत्वाच्या विभागात लावण्यात आलेले आहेत. कॅमेरातून सीईओ कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणार आहे. याचे नियंत्रण ते आपल्या कक्षातून करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरामुळे आता जिल्हा परिषदमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांवर बारीक नजर राहणार आहे. कॅमेरा लावण्यात आल्याने काही कर्मचाऱ्यांची मोठी गोची झाली असून काहींनी यामुळे पारदर्शक कामे होतील व कामचुकाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार असल्याने स्वागत केले आहे. यानंतर काही दिवसात येथील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.(शहर प्रतिनिधी)