शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकृत्रिम पाणी टंचाई । शेतशिवारातून आणले जातेय पिण्याचे पाणी, टिल्लू पंपही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथे भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पुरवठा करणाऱ्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे काही नागरिक टिल्लू पंपांचा वापर करीत असल्याने पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरीकच टँकरने शेतशिवारातुन पिण्याचे पाणी गावात वितरीत करीत आहे.जवळपास १२०० लोकसंख्या असलेल्या लाखांदूर तालुक्यातील किरमटी गावात मागील काही वर्षांपूर्वी लघु पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वीत तरण्यात आली होती. सबंधित योजनेंतर्गत गावातील नळ योजनेला मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने पुढील काळात या गावात भारत निर्माण योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. सदर टाकीतील मागील अनेक वषार्पासुन नळ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी या जलकुंभात जुण्याच नळ योजनेच्या विद्युत पंपाद्वारे पाण्याची साठवण केली जात आहे.पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गावातीलच एका सार्वजनिक हातपंपावर बसविले असताना उन्हाळ्यात या हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचा उपसाही कमी झालेला आहे. मागील काही वर्षापासून मोठे जलकुंभ असुनही गावकऱ्यांना पर्याप्त पिण्याचे पाणी ऊपलब्ध होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना शेतशिवारातुन टँकरद्वारे कृषीपंपाचे पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गावात नव्याने एक बोअरवेल मंजुर केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सबंधित बोअरवेलचे बांधकाम होऊ शकले नाही असेही सरपंचांनी सांगीतले. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन पाण्याची कृञीम टंचाई दुर करण्यासाठी मंजुर बोअरवेलचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.तहान लागल्यावर...पाण्याची कृत्रिम किंवा नैसर्गीक टंचाई निर्माण झाल्यावरच उपाययोजना राबविली जाते. किंबहूना तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. दरवर्षीच पाणीटंचाईला तोंड देत असताना नियमित व कायमस्वरूपी उपाययोजनेकडे लक्ष देण्यात विलंब होत असतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.टिल्लु पंपाद्वारे होणारी पाण्याची साठवण या गैरप्रकाराची माहिती येथील ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली. नळांना टिल्लू पंप लावून पाणी साठवण करणाऱ्या विरोधात कारवाई करताना गावातील काही नागरिकांनी टिल्लू पंप जप्त करण्यात आले.- सुनिता मेश्राम, सरपंच, किरमटी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई