शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकृत्रिम पाणी टंचाई । शेतशिवारातून आणले जातेय पिण्याचे पाणी, टिल्लू पंपही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथे भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पुरवठा करणाऱ्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे काही नागरिक टिल्लू पंपांचा वापर करीत असल्याने पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरीकच टँकरने शेतशिवारातुन पिण्याचे पाणी गावात वितरीत करीत आहे.जवळपास १२०० लोकसंख्या असलेल्या लाखांदूर तालुक्यातील किरमटी गावात मागील काही वर्षांपूर्वी लघु पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वीत तरण्यात आली होती. सबंधित योजनेंतर्गत गावातील नळ योजनेला मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने पुढील काळात या गावात भारत निर्माण योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. सदर टाकीतील मागील अनेक वषार्पासुन नळ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी या जलकुंभात जुण्याच नळ योजनेच्या विद्युत पंपाद्वारे पाण्याची साठवण केली जात आहे.पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गावातीलच एका सार्वजनिक हातपंपावर बसविले असताना उन्हाळ्यात या हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचा उपसाही कमी झालेला आहे. मागील काही वर्षापासून मोठे जलकुंभ असुनही गावकऱ्यांना पर्याप्त पिण्याचे पाणी ऊपलब्ध होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना शेतशिवारातुन टँकरद्वारे कृषीपंपाचे पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गावात नव्याने एक बोअरवेल मंजुर केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सबंधित बोअरवेलचे बांधकाम होऊ शकले नाही असेही सरपंचांनी सांगीतले. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन पाण्याची कृञीम टंचाई दुर करण्यासाठी मंजुर बोअरवेलचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.तहान लागल्यावर...पाण्याची कृत्रिम किंवा नैसर्गीक टंचाई निर्माण झाल्यावरच उपाययोजना राबविली जाते. किंबहूना तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. दरवर्षीच पाणीटंचाईला तोंड देत असताना नियमित व कायमस्वरूपी उपाययोजनेकडे लक्ष देण्यात विलंब होत असतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.टिल्लु पंपाद्वारे होणारी पाण्याची साठवण या गैरप्रकाराची माहिती येथील ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली. नळांना टिल्लू पंप लावून पाणी साठवण करणाऱ्या विरोधात कारवाई करताना गावातील काही नागरिकांनी टिल्लू पंप जप्त करण्यात आले.- सुनिता मेश्राम, सरपंच, किरमटी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई