शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तलावाच्या जिल्ह्यातील ६३९ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 22:06 IST

संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देउपाययोजना शून्य : तलाव आटले, विहिरींनी तळ गाठला, पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतल्याने आतापर्यंत उपाययोजना शून्य आहे.भंडारा जिल्ह्यात १३०० वर तलाव आहे. गावागावांत तलाव असल्याने हा जिल्हा टँकरमुक्त म्हणून प्रशासनाने घोषित केला. परंतू जिल्ह्यातील तब्बल ६३९ गावांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहे. अनेक गावात नळयोजना असल्या तरी या नळयोजनांनाही घरघर लागली आहे. गावाजवळचे बोडी, तलाव आटले आहे. हातपंपाना तासनतास हापसल्यानंतर बकेटभर पाणी मिळते. विहिरींनीही तळ गाठला आहे. डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेल्या नळयोजनाही कुचकामी ठरत आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. मोहगाव खदान गावात वारंवार कुत्रीम टंचाई निर्माण होत आहे. येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्धे गाव पाण्यासाठी भटकंती करताना दिसते. पवनी तालुक्यातील चौरस भाग हा सुपीक जमीन आणि पाण्यासाठी प्रसीध्द होता. मात्र वैनगंगा नदीवर गोसेखुर्द येथे धरण झाल्यानंतर या भागातील जलस्त्रोत तळाला गेले आहे. धरण उसाला आणि कोरड घसाला अशी अवस्था या भागाची झाली आहे. साकोली तालुक्यातील एकोडी, पिंडकेपार या परिसरातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृतीआराखडा तयार केला आहे. त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. मात्र एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने याकडे दुर्लक्ष झाले.भंडारा शहरात नळाला केवळ अर्धातास पाणीभंडारा शहराला वैनगंगा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरविल्या जाते. गत महिन्याभरापासून शहरातील नळांना सरासरी अर्धा तास पाणी मिळते. उंच असलेल्या भागात तर दहा ते पंधरा मिनिटच नळाला पाणी येते. त्यामुळे दिवसभराचे पाणी साठवून कसे ठेवावे असा प्रश्न आहे. शहरातील जलवाहिन्यांची अवस्था बिकट असून दुषीत पाणी पुरवठाही होत आहे. काही वॉर्डात ठिकठिकाणी जलवाहिनीचे पाईप फुटलेल्या स्थितीत आहे.भूजलपातळी गेली ३०० फूट खालीभंडारा जिल्ह्यातून जीवनदायी वैनगंगा बारमाही वाहते. मात्र गत काही वर्षांपासून भूजल पातळीत झपाट्याने घट येत आहे. चुलबंद नदीतिरावरील अनेक गावात भूजलपातळी ३०० फूटापर्यंत खाली गेली आहे. ३०० फूट बोरवेल खोदल्यावरही पाणी लागत नाही. पाण्याचा वारेमाप उपसा आणि जलपुर्नभरणाकडे दुर्लक्ष यामुळे भूजल पातळीत झपाट्याने खाली जात आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असले तरी त्या सर्व उपाययोजना कागदावर असल्याचे दिसून येते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई