शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धानाला देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.

ठळक मुद्देतर रब्बी पिकांना होईल आधार : पुरामुळे खरीप हंगामातील धान पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पूरग्रस्त बोरी गावाचे शेतशिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवारातील तीन गावांना पाण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची ओरड होत आहे. अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांनाही दिले आहे.वैनगंगा नद्यांचे काठावर असणाऱ्या बोरी गावाचे शेतशिवारात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. या पुरामुळे शेतकऱ्यांचे धान पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पूराने धान पीक होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पादन निम्म्यावर आले असल्याने लागवड खर्च निघणे कठीण आहे. गावात रोजगाराचे अन्य साधने नाहीत. शेती हा एकमेव व्यवसाय असून मजूरांना यामुळे रोजगार मिळतो. याच व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरीप हंगामातील पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पीक हातात येणार मात्र . त्या पिकांना मावा, तुडतुडाने ग्रासले आहे. पूर आणि किडीमुळे धान पीक हातातून गेले आहे. शेतकऱ्यांचे सारे कुटुंब कामे करीत आहेत.शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल राज्यातील शासन कटिबद्द असल्याने शेतकऱ्यांचे अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी आशावादी झाले आहेत. मदतीने त्यांना आधार मिळणार असला तरी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उन्हाळी धान पिकांना पाणी वितरणाचे नियोजन करण्याची ओरड सुरू झाली आहे.बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.शासनाची आर्थिक मदत अल्प राहणार असल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता शेतकरी ओरडत आहेत. या गावांना पाणी देण्याकरीता सत्तापक्षाचे कार्यकर्ते अनुकूल असून यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. खासदार प्रफुल पटेल, आमदार राजू कारेमोरे यांना शेतकऱ्यांनी पाण्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष देवाचंद ठाकरे यांनी निवेदन देऊन चर्चा केली.बोरी, उमरवाडा, नवरगाव शेत शिवारात उन्हाळी धान पीक लागवड करिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी प्रकल्प प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे, या संदर्भात वरिष्ठ यांचे सोबत चर्चा करणार असून राज्य शासन शेतकऱ्यांचे पाठीशी आहे.-रेखा ठाकरे, माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प