शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धानाला देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 05:00 IST

बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.

ठळक मुद्देतर रब्बी पिकांना होईल आधार : पुरामुळे खरीप हंगामातील धान पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : पूरग्रस्त बोरी गावाचे शेतशिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवारातील तीन गावांना पाण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची ओरड होत आहे. अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांनाही दिले आहे.वैनगंगा नद्यांचे काठावर असणाऱ्या बोरी गावाचे शेतशिवारात नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. या पुरामुळे शेतकऱ्यांचे धान पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पूराने धान पीक होत्याचे नव्हते झाले आहे. उत्पादन निम्म्यावर आले असल्याने लागवड खर्च निघणे कठीण आहे. गावात रोजगाराचे अन्य साधने नाहीत. शेती हा एकमेव व्यवसाय असून मजूरांना यामुळे रोजगार मिळतो. याच व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. खरीप हंगामातील पीकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पीक हातात येणार मात्र . त्या पिकांना मावा, तुडतुडाने ग्रासले आहे. पूर आणि किडीमुळे धान पीक हातातून गेले आहे. शेतकऱ्यांचे सारे कुटुंब कामे करीत आहेत.शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल राज्यातील शासन कटिबद्द असल्याने शेतकऱ्यांचे अपेक्षा वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी आशावादी झाले आहेत. मदतीने त्यांना आधार मिळणार असला तरी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उन्हाळी धान पिकांना पाणी वितरणाचे नियोजन करण्याची ओरड सुरू झाली आहे.बोरी, उमरवाडा, नावरगाव शिवारात उन्हाळी धान पीक लागवडीसाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी दिल्यास संजीवनी ठरणार आहे. खरीप हंगामातील पुरामुळे झालेली अन्यधान्य नासाडीची भरपाई काढण्याकरिता शेतकऱ्यांना आधार होणार आहे. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची ओरड शेतकरी करीत आहेत. गावाचे शिवारात प्रकल्पाचे नहर आणि कालवे आहेत. यामुळे प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकांना मिळण्या करिता शेतकरी संघर्ष करीत आहेत.शासनाची आर्थिक मदत अल्प राहणार असल्याने बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याकरिता शेतकरी ओरडत आहेत. या गावांना पाणी देण्याकरीता सत्तापक्षाचे कार्यकर्ते अनुकूल असून यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. खासदार प्रफुल पटेल, आमदार राजू कारेमोरे यांना शेतकऱ्यांनी पाण्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष देवाचंद ठाकरे यांनी निवेदन देऊन चर्चा केली.बोरी, उमरवाडा, नवरगाव शेत शिवारात उन्हाळी धान पीक लागवड करिता बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी प्रकल्प प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे, या संदर्भात वरिष्ठ यांचे सोबत चर्चा करणार असून राज्य शासन शेतकऱ्यांचे पाठीशी आहे.-रेखा ठाकरे, माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प