शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अपघातानंतर प्रशासनाला जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:11 AM

सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.

ठळक मुद्देसहा जणांचा बळी : चुलबंद नदीवरील पुलाची साफसफाई

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सहा जणांचा अपघातात बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. साकोलीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील धर्मापुरी कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरील माती काढून परिसराची साफसफाई करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय, हे मात्र नागरिकांना उमगले नाही.साकोली लाखांदूर राज्य मार्गावर कुंभली येथे चुलबंद नदीवर जुना पुल आहे. या पुलावर काही दिवसांपूर्वी मोठाले खड्डे पडले होते. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी मकरसंक्रांतीला दुर्गाबाई डोहाची यात्रा भरते. लाखो लोक येथे येतात. परंतु या पुलाकडे दुर्लक्ष होतो. या पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपेही वाढली आहेत. त्यामुळे पुलावरून जाताना वाहन चालविणे कठीण झाले होते. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसापूर्वी काळीपिवळी जीप पुलावरून खाली कोसळली आणि सहा जणांचा बळी गेला. यानंतर प्रशासन खळबडून जागे झाले. दुसऱ्या दिवशी पुलावर असलेली माती, केरकचरा साफ करण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने साफ केला. यावरून स्पष्ट होते की, जोपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही. या पुलावर गतीरोधकाचीही गरज आहे.पुलाची चौकशी कराकाळीपिवळी अपघातानंतर या पुलाचे दहा ते बारा कठडे तुटले. या पुलाला जोरदार धक्का बसला. त्यामुळे या पुलावर काय परिणाम झाला याची चौकशी करण्याची गरज आहे. समोर पावसाळा आहे. त्यामुळे पुन्हा असा भीषण अपघात होऊ नये म्हणून पुलाची चौकशीची गरज आहे.

टॅग्स :Accidentअपघात