शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:29 IST

पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा कारभार कागदावरच : खत खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरु झाला तरी पावसाअभावी अद्याप शेतकºयांनी धानाचे पऱ्हे टाकलेले नाहित. त्यामुळे यावर्षी धान रोवणीचा हंगाम पुढे जाण्याची शक्यता आहे.चौरास भागात पाणी असले तरी आजही अनेक शेतकरी कोरडवाहू शेती करतात.त्यामुळे निसर्गाच्या कृपेवरच शेतकरी अवलंबून आहे.परिसरात अजून दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत.काही ठिकाणी सिंचन सुविधा असणारे शेतकरी पऱ्हे टाकण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. कोरडवाहू शेतकºयांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दररोज आकाशात ढग गोळा होतात पण पाऊस मात्र पडत नाही. सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे शेतशिवारात काडीकचरा जमा करणे, धुरे पेटविणे यासारखी कामे शेतकरी सकाळच्या वेळेत करतानाचे चित्र दिसत आहे.बैलजोड्यांची संख्या घटल्याने शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. कोंढा परिसरात गेल्या तीन वर्षापासुन कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाने दगा दिल्याने धान उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतीव्यवसाय परवडत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम पूर्व सभा घेवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असताना कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे जिल्हा, तालुक्याच्या वरीष्ट अधिकाºयांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.पीक कर्जासाठी लगबगकोंढा परिसरात शेतकरी शेती हंगामासाठी पैशाची जमवाजमव करताना दिसून येत आहे. विविध सेवा सहकारी संस्था, तसेच सहकारी बँक व बँक आॅफ इंडियासह ईतर बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जासाठी प्रथम प्राधान्य सेवा सहकारी संस्थेला आहे.कारण येथे शेतकºयांना वर्षाकाठी फक्त मुद्दलच जमा करावे लागते. ईतर बँकेतव्याजसहीत मुद्दल जमा करावे लागते. कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करतात. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ न केल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्ल प्रचंड नाराजी आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.खते, बियाण्यांच्या किंमती वधारल्याबियाण्यांच्या किंमतीत दरवर्षीच वाढ होत आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आपल्याला कमी किंमतीत कोणते बियाणे मिळेल याच्या शोधात असतो. कोंढा परिसरात बोगस बियाणे, किटकनाशकांची छुप्या पद्धतीने विक्री सुरु असल्याची चर्चा आहे.यावर आळा घालण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.परंतु तसे होताना दिसत नाही.अनेक कृषीकेंद्र धारक पक्की बिले देत नसतानादेखील कृषि अधिकारी डोळेझाक करताना दिसून येत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी