शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

४५ गावातील धान पीकधोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:44 AM

सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देसिहोरा परिसरातील शेतकरी संकटात : चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा परिसरातील सुमारे ४५ गावातील धानाची खार वाळत चालली असून रोवणी खोळबंली आहे. चांदपूर जलाशयातून धान पीक वाचविण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी केली जात आहे. २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी दिला आहे.पावसाळा सुरू होऊन महिना लोटला. मागील २० दिवसांपासून पाऊस पडला नाही. सुरूवातीला आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली ती खार आता आली आहे. खार पिवळी पडली तर कुठे ती गळायला सुरवात झाली आहे. काहींनी रोवणी केली, तीव्र उष्णतेमुळे शेतात भेगा पडायला सुरूवात झाली आहे. सिहोरा परिसरातील ४५ गावात शेतीकरिता चांदपूर जलाशयातील पाण्याचा विसर्ग करण्याची मागणी जोर धरत आहे.अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. चांदपूर जलाशयात सध्या २६.५४ टक्के पाणी साठा इतका आहे. जिवंत साठा २५ टक्के आहे. नियमानुसार येथे ३३ टक्के पाणीसाठा असेल तरच जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येते. परंतु किमान काही दिवस संपूर्ण धानाचे पीक वाचविण्याकरिता येथे पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.जिल्हा पाटबंधारे विभागाकडे मागणीस्थानिक पाटबंधारे विभागाने भंडारा येथील कार्यालयाकडे १९ जुलै रोजी चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता एका पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु अद्याप परवानगी मिळाली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये येथे पाण्याचा विसर्ग करण्याची परवागनी मिळाल्यानंतरच चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. अद्याप येथे प्रतीक्षा करावी लागत आहे.राकाँने दिला अल्टिमेटमराकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रामदयाल पारधी यांनी चांदपूर जलाशयातून २५ जुलैपर्यंत पाण्याचा विसर्ग न केल्यास २६ जुलै रोजी स्थानिक शेतकऱ्यांसोबत चांदपूर जलाशयाचे गेट उघडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी नरेश गीते मंगळवारी रूजू झाले. त्यांनी सदर समस्येकडे गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.चांदपूर जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता १९ जुलै रोजी भंडारा येथील मुख्य कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी रितसर प्राप्त होताच पाण्याचा विसर्ग करण्यात येईल.-जे.आर. हटवार, उपविभागीय अभियंता, चांदपूर प्रकल्प तुमसर.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीकपात