शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM

कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देशहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस : कोंढा परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मेघ गर्जनेसह जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला. विशेषत: उन्हाळी धानावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तव्दतच भाजीपाला पिकांवरही संक्रात आली आहे.यावर्षी हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. भंडारा शहरात रात्री ११.३५ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी वीज पुरवठाही खंडीत झाला. पहाटे ५ वाजतापर्यंत अधूनमधुन ब्रेक घेत पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून पुन्हा ऊन निघाली. दुपारी ३ वाजतानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखनी, मोहाडी व तुमसरातही पाऊस बरसल्याचे वृत्त आहे.पालांदूर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतमालाचे नुकसान झाले असून उन्हाळी धानाचा हंगाम प्रभावीत झाला आहे.कापणी केलेल्या धानाच्या कडपा ओलेचिंब झाले आहे. काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी तुडतुड्याची लागल झाली म्हणून फवारणी सुध्दा केली होती. यात धानपीक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाºयासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.लाखांदुर येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, काल ९ मे रोजी झालेल्या गारपिटीसह वादळी पावसाने तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकरी बेजार झाले असून हाता पोटात आलेले उन्हाळी धान पिक नष्ट होण्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या गारपीटीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांची तुरळक नुकसान देखील झाले आहे.यंदाच्या उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्यातील चौरस भागासह अन्य भागात जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे व कीड रोगामुळे आधीच धानाचे उत्पादन घटण्याच्या मार्गावर असतांना ऐन पंधरवाड्याने कापणीला आलेल्या धानावर गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील धानाच्या लोंबी झडल्या आहेत.तर काही धानाचा निसवा होण्यापुर्वीच गारपिटीने धान पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊन पेरवा या किडयुकित धानाच्या लोंबी बाहेर पडण्याची भिती देखील शेतकºयांत वर्तविली जात आहे. या गारपिटीमुळे ग्रामीण भागातील घरांच्या छपरावरील कवेलुंची देखील तुरळक प्रमाणात हाणी झाल्याचे देखील काही नागरिकांनी सांगीतले आहे मात्र कोरडवाहु शेतकºयांसाठी सदरचा अवकाळी पोषक ठरतांना ऊन्हाळी पिक उत्पादकांसाठी बाधक ठरल्याची बोंब आहे.महागडे बी बियाने व पिककर्ज घेऊन खरीप हंगामात परतीच्या पावसाने तर उन्हाळी हंगामात कधी अवकाळी व सध्याच्या गारपिटीसह वादळी पावसाने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस