शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्हयात यंदा १०० एकरवर होणार तूती झाडांची लागवड

By युवराज गोमास | Updated: July 6, 2024 14:15 IST

Bhandara : तूती लागवड करा अन् चार लाखाचे अनुदान मिळवा !

युवराज गोमासे

भंडारा : पारंपारीक भात शेतीला पर्याय म्हणून जिल्हयात तूती रेशीम उद्योग वाढीसाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा रेशीम कार्यालय प्रयत्नशिल आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्गदर्शनाखाली रेशीम कार्यशाळा आयोजीत झाली होती. जिल्हयात सध्या ४५ एकरवर तूती झाडांची लागवड आहे. महारेशीम अभियान - २०२४ अंतर्गत ६१ नविन शेतकऱ्यांनी नोंदणी झाली असून यंदा प्रशासनाने १०० एकरवर तूती झाडांची लागवड करण्याचे नियोजन आहे.तूती रेशीम उदयोगामध्ये तूती रोपांची लागवड, तूती झाडाच्या पानांचा उपयोग करून कीटक संगोपन व कोष उत्पादन या प्रकीयेचा समावेश आहे. पूर्वी तूतीच्या फांदयांपासून कलम तयार करून झाडाची लागवड व्हायची. त्यामुळे २० ते २५ टक्के तूट पडायची. ज्यामुळे प्रती एकरी ५५०० झाडांची संख्या राहत नव्हती. पर्यायाने प्रति एकरी अंडीपूंजाचे नार्मनुसार संगोपन होत नव्हते. आता ३-४ महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपापासूंन तूतीची लागवड केले जाते. ज्यामुळे तूटीचे प्रमाण कमी झाले आहे.

जुलै ते सप्टेंबरमध्ये तूतीची लागवड केली जाते. एकदा लागवड झाल्यास १० ते १२ वर्ष लागवड करावी लागत नाही. ५ महिने जून्या झाडाच्या पानापासून कीटक संगोपन करता येते. प्रथम वर्षी २०० अंडीपुंज व दुसऱ्यावर्षी ४०० ते ६०० अंडीपुंजाचे संगोपन करता येते. प्रथम वर्षी १०० ते २०० किलो, दुसऱ्यावर्षी २४० ते ३६० किलो कोष उत्पादन घेता येतो.

शेतकऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा रेशीम कार्यालय भंडारामार्फत देण्यात येते. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेशिम विकास अधिकारी ढोले यांनी केले आहे.

मनरेगा अंतर्गत ४,१८,८१५ रूपयांचे अनूदान

तुती रेशीम उद्योगाकरीता मनरेगा व सिल्क समग्र अश्या दोन योजनेतून अनुदान देय आहे. मनरेगा अंतर्गत पंचायत समितीला प्रस्ताव सादर करावा. त्याची एक प्रत जिल्हा रेशीम कार्यालयास सादर करावी. तीन वर्षाकरीता ४,१८,८१५ रूपयांचे अनूदान आहे. त्यात तुती लागवड, जोपासना, कीटक संगोपन व कोष उत्पादन तसेच संगोपन शेड बांधकामाचा समावेश आहे. तूती लागवड, कीटक संगोपनासाठी तीन वर्षात ८९५ अकूशल मजुरीपोटी २,६५,८१६ व कुशल साहित्य रक्कम १,५३,००० याप्रमाणे ४,१८,८१५ रूपयांचे अनुदान दिले जाते.

सील्क समग्र योजनांतर्गत युनिटच्या ७५ टक्के अनुदान

जे मजूर मनरेगामध्ये बसत नाही, त्यांचेकरीता केंद्र पुरस्कृत सील्क सम्रग योजना आहे. त्यात तुती लागवडीकरीता ५०,००० रूपये, कीटक संगोपन साहित्य ७५ हजार, निरजंतुकीकरणासाठी ५ हजार व रेशीम शेड बांधकाम खर्च २,४३,७५० रूपये याप्रमाणे ३,७३,७५० युनिटच्या ७५ टक्के अनुदान देय आहे.

 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा