शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन बंद करा!

By admin | Updated: September 5, 2014 01:08 IST

राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता

व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन : समस्या सोडविण्याची ग्वाही नागपूर : राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना दिलेल्या निवेदनात केली. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी सदर निवेदन देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बावनकुळे यांनी यावेळी कामठी येथील विविध समस्या मांडल्या. यात गणेशोत्सवादरम्यान भारनियमन पूर्णपणे बंद करण्यात यावे, कामठीतील जयस्तंभ चौक ते महात्मा गांधी चौक आणि पोलीस ठाणे ते शिवाजी चौका दरम्यानच्या दुभाजकावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, बाबू हरदास चौक ते भाजीमंडी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावरील जड वाहतूक सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान बंद करण्यात यावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची वेळीच दुरुस्ती करण्यात यावी, गणेशात्सव मंडळांना नाहरकत प्रमाणपत्र एक खिडकी योजनेंतर्गत देण्यात यावे, भाजीमंडी चौक ते महादेव घाट कन्हान नदीदरम्यान तात्पुरता वीज पुरवठा करून पथदिवे लावण्यात यावे, श्री गणेश विसर्जनादरम्यान अपघात होऊ नये यासाठी कन्हान नदीच्या घाटावर नावाडी, बोट व जीवन रक्षक पथक तैनात करण्यात यावे, उत्सवादरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा यासह एकूण २२ मागण्या त्यांनी लावून धरल्या होत्या. सदर निवेदन व मागण्यांची दखल घेत प्रशासनाने कामठी येथे एक खिडकी योजना राबविली. शिवाय, महत्त्वाच्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे लावून अंतर्गत रस्त्यांची दुरुस्तीही केली. जड वाहतुकीची समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली. (प्रतिनिधी)