शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नळाला गढूळ पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:15 AM

शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही.

ठळक मुद्देभंडारा शहर : नगरपरिषदेचे दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात महिनाभरापासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात विविध विकास कामांचा धडाका सुरु असला तरी पाणी समस्या कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ आणि चिखलयुक्त होत आहे. याचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांना पोटदुखी, काविळ, चक्कर येणे यासारखी आजारांचा सामना करावा लागतो. शहरापासून अवघ्या २ किमी अंतरावर जीवनवाहिनी वैनगंगा नदी असतांना शहरवासीयांना पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने अनेकांना अधिकचे पैसे मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे. घरटॅक्स नियमित भरत असल्याने नागरिकांना लाईट, पाणी, रस्ते यासह विविध सुविधा नगर परिषद प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. परंतू अद्याप तरी लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षीतपणाने शहरवासीयांना पाण्याची समस्या कायमच भेडसावित आहे.शहरातील अत्यंत नावाजलेल्या खात रोड परिसरात वैशाली नगर, केशव नगर, मातृस्मृती नगर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पायपीट करावी लागत आहे. अनेकजण बोअरवेल खोदत आहेत. परंतू ३०० फुटापर्यंतही पाणी नसल्याने बोअरवेलचाही कोणताही उपयोग होत नाही. भूजल पातळी खालावली असताना प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. राज्यशासनाकडून पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी अनेक प्रयत्न होताना दिसतात. परंतू भंडारा नगर परिषदेकडून मात्र याबाबत कोणतीही जनजागृती झालेली दिसत नाही. त्यातच शहरात असणारी झाडांची मर्यादीत संख्या वाढते तापमान व दरवर्षीच भेडसावणारा पाणी टंचाईचा प्रश्न यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहे. शहरालगतच्या भागात सार्वजनिक नळांवर महिलांची गर्दी वाढत असल्याने तिथे त्यांना आपसात भांडण करावा लागत असल्याचे पण चित्र दिसत आहेत. पाण्यासाठी महिला पुरुष आपल्या छोट्या मुलांना सुद्धा बोअरवेल, सार्वजनिक नळ, विहिरीवर नेत असल्याचे बोलके चित्र आहे.शहरालगतच्या भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाऱ्याने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.नाग व कन्हानच्या दूषित पाण्याचा फटकाजीवनदायीनी वैनगंगेचे पाणी नागनदी व कन्हान नदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आणि कित्येक वर्षापासून वैनगंगेच्या पाण्यावर जीवन जगून आयुष्यभर तृष्णा भागविणारे तरुण, म्हातारे व महिलासुद्धा वैनगंगेच्या पाण्याकडे वाकडी नजर करून आर.ओ. महागड्यावर जीवन कंठीत आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या सणासमारंभापासून घरगुती दैनंदिन पाणी पिण्यासाठी सुद्धा आर.ओ. चे पाणी महागात खरेदी करून पिण्याची फॅशनच झाल्यासारखे दिसते.प्रशासनाचा हलगर्जीपणामागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यंदा मार्च महिन्यात शहराचा टंचाई आराखडा तयार करुन वॉर्ड निहाय परिस्थितीचा आढावा घेणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागात पाणी टंचाईची झळ नागरिकांना बसत आहे. प्रशासनाना केवळ बोअर अधिक प्राध्यान्य दिले जात आहे. परंतू तात्पूरत्या नळ दुरुस्तीसह इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायम स्वरुपी पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासनाकडून चालढकल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.उंच भागात अल्प पाणीशहरात असणा-या तलावात, विहिरीत पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात उंच भागात तर पाणी पुरवठाच होत नाही तर काही भागात अल्प पाणी येत आहे तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरड सुरु आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई