शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

एप्रिल महिन्यातच तलाव आटल्याने जलसंकट भेडसावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:13 IST

पाणी पातळी खालावली : जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ ३५ टक्के जलसाठा

भंडारा : जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्प, ३१ लघु प्रकल्प, २८ मालगुजारी तलाव या सर्व ठिकाणची पाणी पातळी निम्म्यावर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कडक उन्हाळा सुरू झाल्याने बहुतांशी तलाव आटले असून मोठ्या प्रकल्पातील जलस्तर खालावला आहे. त्यामुळे येत्या दिवसात जलसंकट भेडसावणार आहे. सध्या ४८.४५ दलघमी म्हणजे ३९.७९३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ५२.५३ दलघमी म्हणजे ४३.२४० टक्के पाणीसाठा होता.

भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी जलसाठा बघेडा जलाशयात ३५.३२४ आहे. तर सर्वांत जास्त जलसाठा सोरना जलाशयात ५५.२२२ टक्के आहे. चारही जलाशयांची पातळी ४८.४६४ टक्के आहे. लघु प्रकल्पांची संख्या ३१ आहे. त्यात कुरमडा, कवलेवाडा, पवनारखारी, अंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली (ता. तुमसर), नागठाणा टांगा, हिवरा (ता. मोहाडी), आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी (ता. भंडारा), वाही, भिवखिडकी, कातुर्डी, पिलांद्री (ता. पवनी), शिवनीबांध, कुंभली, गुढरी (ता. साकोली), सालेबर्डी (ता. लाखांदूर), भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शीपार (ता. लाखनी) या ३१ लघुप्रकल्पांचा समावेश असून येथे १८.६७१ दलघमी म्हणजेच ३४.८७२ टक्के जलसाठा आहे. 

या सर्व जलाशयांचा विचार केल्यास कुरमडा, पवनारखारी, परसवाडा, टांगा, हिवरा, डोडमाझरी, चिखलपहेला, रावणवाडी, कुंभली या जलाशयातील साठा कमालीचा खालावला असून ३० टक्क्यांच्या आत आहे. तर जवळपास १३ प्रकल्पातील जलसाठा ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

चारही मध्यमप्रकल्पातील जलसाठयात घटभंडारा जिल्ह्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली, सोरना हे ४ मध्यम प्रकल्प आहेत. सध्या या चारही प्रकल्पात ४८.४६४ दलघमी २०.७५० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत ४५.५७२ टक्के दलघमी १९.५१२ असा उपयुक्त जलसाठा होता.

मालगुजारी तलावात अत्यल्प जलसाठाजुन्या मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. आजच्या स्थितीत २८ पैकी १३ तलावातील जलसाठा २५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. एकोडी, पाथरी, सावरबंध, लवारी, उमरी, सानगडी, केसलवाडा या तलावात फक्त अल्प जलसाठा शिल्लक आहे. प्रखर उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच या तलावातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसाने काही अंशी जलसाठ्यात भर पडली आहे.

टॅग्स :Waterपाणी