शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निम्न चुलबंद प्रकल्पाची चाचणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:16 PM

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती ...

ठळक मुद्देपाणी तलावात सोडणार : सहा हजार हेक्टर सिंचनाची सुविधा

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. यासाठी सोमवारला पंपहाऊस व संबंधित यंत्र सज्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.साकोली तालुक्यात पारंपारिक शेती व्यवसाय असून बहुतांश लोक भात शेती करतात. तालुका निसर्ग सानिध्यानी नटलेला असून या तालुक्यातून चुलबंद नदीचा प्रवाह आहे. मात्र शेतीला सिंचनाची सोय नव्हती. शेती सिंचनासाठी चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्पाचे १९९५ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. तेव्हापासून कधी राजकीय अडचणी तर कधी निधीची कमतरता अशा एक ना अनेक अडचणीतून हा प्रकल्प रेंंगाळत्ला. शेतकऱ्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढतच गेली. एकेकाळी तर शेतकऱ्यांची निराशाच झाली होती की हा प्रकल्प होणार की नाही. अनेक वर्षे निधीअभावी या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात होते. नंतर पुन्हा या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाला. आता लवकरच प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे असून चुलबंद नदीचे पाणी या प्रकल्पात अडविण्यात येणार आहे. तसेच हे अडविलेले पाणी पंपहाऊसच्या सहाय्याने डाव्या व उजव्या कालव्याच्या सहाय्याने तलावात सोडण्यात येणार आहे.तलाव पूर्ण भरणारया प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून तलाव प्रकल्पाच्या पाण्याने पूर्णपणे भरण्यात येणार आहेत. डिसेंबरपर्यंत प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे.पिण्यासाठी राखीव राहणार पाणीया प्रकल्पांतर्गत डिसेंबरपर्यंत पाणी तलावात व नंतर येणारे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना दिलासाया प्रकल्पाच्या उभारणीमुळे शेतीला सिंचनाची सोय आहे. त्यामुळे निसर्गावर अवलंबून राहणाऱ्यां शेतकऱ्यांना आता तलावाचे पाणी मिळणार. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सदर प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पंगृहाऊसचे काम पूर्ण झाले असून या पंपहाऊसची चाचणी पूर्ण झाली आहे. येत्या एक दोन दिवसातच या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार असून या पाण्याचा शेतीला मोठा फायदा होणार आहे.-अमोल चोपडे, उपविभागीय अभियंता