शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस असलेल्या तहसीलदारांचे केबिन सर्वसामान्यांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

मोहाडी : साधारणतः कोणत्याही कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याच्या केबिनचे दार नेहमी बंद असते किंवा ‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ असा फलक ...

मोहाडी : साधारणतः कोणत्याही कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याच्या केबिनचे दार नेहमी बंद असते किंवा ‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ असा फलक लागल्याचे पाहण्यात येते. मात्र, आयएएस असलेल्या महिला अधिकारी येथे एका महिन्यासाठी तहसीलदार म्हणून रूजू झाल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या त्या परंपरेला फाटा देत महिनाभर त्यांच्या केबिनचे दार खुले ठेवले. एवढेच नाही तर केबिनबाहेर आपला मोबाईल क्रमांकसुद्धा लिहून नवा किर्तीमान स्थापन केला.

आयएएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागाचा अनुभव घेण्यासाठी विभागप्रमुख म्हणून एक किंवा दोन महिन्यांसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे आयएएस असलेल्या मीनल करणवाल यांना मोहाडी येथे सर्वप्रथम गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी येथे एक महिना व नंतर तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय मोहाडी येथे एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. देहराडून उत्तराखंड येथील सर्वसामान्य परिवारातून आलेल्या व सर्वसामान्य व्यक्तीची जाणीव असलेल्या या आयएएस महिला अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात कामकाजाची एक वेगळी शिस्त लावली. एरव्ही कोणत्याही वेळी पानटपरीवर दिसणारे कर्मचारी यामुळे दिवसभर आपल्या टेबलवर काम करताना दिसायचे. साधारणतः सामान्य व गरीबवर्गातून येणारे नागरिक सहसा आपली समस्या घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी धजावत नाहीत किंवा शिपाई त्यांना आत जाऊ देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी तहसीलदार मीनल करनवाल यांनी आपल्या केबिनचे दार नेहमी खुले ठेवण्याचा आदेश दिला. त्यांच्या काळात कोणीही आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकत होता. एवढेच नाही तर कोणीही, केव्हाही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत काही तक्रारी असल्यास किंवा समस्या असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असा फलक केबिन बाहेर लावून आपला मोबाईल क्रमांकसुद्धा दिला होता. त्यांच्या केबिनचे दार नेहमी खुले ठेवणे व महिला असूनसुद्धा सर्वांसाठी मोबाईल क्रमांक केबिनबाहेर लिहून ठेवण्याच्या या वेगळ्या भूमिकेमुळे त्यांनी तालुक्यातील जनतेचे मन जिंकले. २९ जानेवारीला त्यांचा एक महिन्याचा येथील कार्यकाळ संपला. त्या भंडारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून एक फेब्रुवारीला रूजू होणार आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र, येथील जनतेच्या मनात त्यांचा एक महिन्याचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहील, हे विशेष.

कोट

"सामान्य नागरिक मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या घेऊन पोहोचू शकत नाहीत. याची मला जाणीव असल्यानेच मी असे निर्णय घेतले. भविष्यातसुद्धा माझी हीच भूमिका राहील.

मीनल करणवाल, आयएएस