शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेतीघाटांना स्थगिती, मात्र अहोरात्र खनन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:20 IST

जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.

ठळक मुद्दे४९ घाट : न्यायालयीन प्रक्रियेत अडकला लिलाव

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आदी नद्यांवर रेतीघाट आहे. भंडारा जिल्ह्यातील रेतीला विदर्भात मागणी आहे. त्यामुळेच या रेतीवर कंत्राटदारांच्या उड्या पडतात. प्रशासनाने रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. ४९ पैकी १९ रेतीघाटांचे लिलाव झाले होते. त्यात लाखनी तालुक्यातील पालांदूर शेजारी वाकल व पाथरी घाट सुमारे तीन कोटी रूपयात गेला होता. उर्वरित घाटांचा लिलाव काही कारणाने झाला नाही. पळसगाव घाट राखीव ठेवण्यात आला. विक्री झालेल्या घाटातून नियमानुसार निश्चित दराने रेतीची उचल सुरू झाली. परंतु न्यायालयीन अडथळ्याने रेती उत्खनन व वाहतुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे प्रशासनाने ताबा घेत घाटावर बंदी आणली.मात्र जिल्ह्यातील बहुतांश घाटांवरून रेतीची वाहतूक खुलेआम सुरू आहे. तुमसर, पवनी तालुक्यातील घाटांवरून शेकडो वाहने रेतीची चोरी करीत आहे. हा प्रकार जिल्हा खनिकर्म विभागासह महसूल अधिकाऱ्यांना माहित आहे. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.भंडारा जिल्ह्यात रेतीतस्कर सध्या धुमाकूळ घालत असून यात अनेकांचा बळी गेला आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावर एक विद्यार्थी जेसीबीच्या पंजाने जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर महसूलच्या पथकाला न जुमानता वाहने पळवून नेण्याच्या घटनातही वाढ झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.लिलावासाठी कंत्राटदारांची चेनजिल्ह्यातील रेतीघाटांची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. त्यामुळे एकापेक्षा अधिक कंत्राटदार एकत्र येऊन चेन तयार करतात. आॅनलाईन पद्धतीने सोपस्कार आटपून प्रक्रिया केली जाते. ज्या कंत्राटदारांना घाट मिळाले नाही ते न्यायालयात पोहोचतात. तेथून स्थगिती मिळते मात्र या काळात रेतीची तस्करी जोमात होते.खनन बंदी मात्र बांधकाम सुरूभंडारा जिल्ह्याचे रेतीघाटावर खननाला बंदी असली तरी सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू आहे. यात शासकीय कामांचाही समावेश आहे. एकीकडे रेतीघाटावर बंदी असताना दुसरीकडे रेती उपलब्ध कशी होते, हा संशोधनाचा विषय आहे.