शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM

मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाहुणगावची गुणवंत विद्यार्थिनी, समाजकार्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : ग्रामीण प्रतिभेला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे बघावयास मिळते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींपुढे तिने आदर्श निर्माण केला.मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले. खरे पाहता मुन्नीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतले. शाळेत जाताना ती दररोज सायकलने जायची.शालेय शिक्षणापासूनच तिला समाजसेवेची आवड होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिने बारावीनंतर बीएसडब्लू अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गडचिरोली येथे जाऊन तिने बीएसडब्लू पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच लागलेल्या निकालात मुन्नी कावळे गोंडवाणा विद्यापीठातून प्रथम मेरिट आली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत मुन्नीने तालुक्याच्या शिरात मानाचा तुरा खोवला. तिचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.ग्रामीण प्रतीभामुन्नी कावळे या विद्यार्थिनीने ग्रामीण प्रतीभा सिद्ध करून दाखविली. विविध अडचणींचा सामना करीत तिने उच्च शिक्षण घेतले. प्रत्येक परीक्षेत ती गुणवत्ता यादीत चमकत गेली. समाजकार्य विषयाची पदव्युत्तर पदवी तिने विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आता तिला ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करावयाचा आहे. तिने जे ग्रामीण भागात अनुभवले त्या समस्या तिला उजागर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. ग्रामीण महिलांच्या समस्यांवरही तिला काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातून आलेली ही विद्यार्थिनी समाजकार्य विषयातून आता आपल्या गावालाच नव्हे तर परिसराला विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठStudentविद्यार्थी