शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
3
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
4
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
5
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
6
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
7
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
8
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
9
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
10
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
11
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
12
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
13
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
14
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
15
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
16
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
17
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
18
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
19
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
20
औषधांच्या कठाेर गुणवत्ता तपासणीसाठी आता कायदा; विषारी सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने घेतला निर्णय

नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

विशाल रणदिवे अडयाळ : नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन ...

विशाल रणदिवे

अडयाळ :

नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. एकीकडे पावसाने दडी मारली आणि दुसरीकडे उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्र. १ आंबाडी कार्यालय मार्फत गावागावांत एक जाहीर सूचनेचे पत्रक लावण्यात आले आहे. त्यात पाणीपट्टी जमा केल्याशिवाय यावर्षी सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

आता पुन्हा शेतकरी निसर्गासोबतच नेरला उपसा सिंचनही जर कोपला तर पुढे काय होणार? नेरला उपसा सिंचन योजनेचे २०१५-१६ ला ई-जलपूजन झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत गेले आणि आजही कामे पूर्ण झाली नाही. २०१८-१९-२०-२१ या तिन्ही वर्षाची खरीप हंगाम पाणीपट्टी ज्यांच्याकडे थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आंबाडी कार्यालयात भरणे आहे. नेरला उपसा सिंचन यामध्ये एकूण १२ व्हीटी पंप तेही १०१५ अश्वशक्तीचे लावले गेले असल्याची माहिती आहे. गत चार वर्षेपासून सुरू आहे. त्यातील दोन वर्षे वगळता फक्त तीन वर्षांचे हेक्टरी ६००, ९०० रुपये शेतकऱ्यांना भरणे आहेत.

माहितीनुसार धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे आत्तापर्यंत जेवढी रक्कम आहे. त्यातून एक पाव सुद्धा रक्कम जमा होत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी सुद्धा चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत नेरला उपसा सिंचन अधिकारी आणि शेतकरी दोन्ही चिंताजनक स्थितीत आहेत. या नेरला उपसा सिंचनामुळे शेतकऱ्यांना फायदा तर झालाच, पण येथील कामे आजही अपूर्ण असल्याने शेतकरी सुद्धा चिंता व्यक्त करतो आहे. अड्याळ आणि परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक पडतो की नाही हे एक कोडेच आहे, पण पाणी जर लागलेच तर मग नेरला उपसा सिंचन शिवाय पर्याय नाही असे असले तरी जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी रक्कम जमा करणार नाही तोपर्यंत सिंचनाचे पाणी सोडण्यात येणार नाही.