शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST

विशाल रणदिवे अडयाळ : नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन ...

विशाल रणदिवे

अडयाळ :

नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी यंदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?, असा प्रश्न नेरला उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. एकीकडे पावसाने दडी मारली आणि दुसरीकडे उपविभागीय अभियंता पागोरा उपसा सिंचन उपविभाग क्र. १ आंबाडी कार्यालय मार्फत गावागावांत एक जाहीर सूचनेचे पत्रक लावण्यात आले आहे. त्यात पाणीपट्टी जमा केल्याशिवाय यावर्षी सिंचनाकरिता पाणी सोडण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

आता पुन्हा शेतकरी निसर्गासोबतच नेरला उपसा सिंचनही जर कोपला तर पुढे काय होणार? नेरला उपसा सिंचन योजनेचे २०१५-१६ ला ई-जलपूजन झाले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत गेले आणि आजही कामे पूर्ण झाली नाही. २०१८-१९-२०-२१ या तिन्ही वर्षाची खरीप हंगाम पाणीपट्टी ज्यांच्याकडे थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना आंबाडी कार्यालयात भरणे आहे. नेरला उपसा सिंचन यामध्ये एकूण १२ व्हीटी पंप तेही १०१५ अश्वशक्तीचे लावले गेले असल्याची माहिती आहे. गत चार वर्षेपासून सुरू आहे. त्यातील दोन वर्षे वगळता फक्त तीन वर्षांचे हेक्टरी ६००, ९०० रुपये शेतकऱ्यांना भरणे आहेत.

माहितीनुसार धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे आत्तापर्यंत जेवढी रक्कम आहे. त्यातून एक पाव सुद्धा रक्कम जमा होत नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी सुद्धा चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत नेरला उपसा सिंचन अधिकारी आणि शेतकरी दोन्ही चिंताजनक स्थितीत आहेत. या नेरला उपसा सिंचनामुळे शेतकऱ्यांना फायदा तर झालाच, पण येथील कामे आजही अपूर्ण असल्याने शेतकरी सुद्धा चिंता व्यक्त करतो आहे. अड्याळ आणि परिसरात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक पडतो की नाही हे एक कोडेच आहे, पण पाणी जर लागलेच तर मग नेरला उपसा सिंचन शिवाय पर्याय नाही असे असले तरी जोपर्यंत शेतकरी पाणीपट्टी रक्कम जमा करणार नाही तोपर्यंत सिंचनाचे पाणी सोडण्यात येणार नाही.