शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पावसाळ्यातही लहान, मोठे प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 1:07 AM

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

ठळक मुद्दे१४ टक्केच जलसाठा : शेतकरी संकटात, अनेक गावांत जलसंकट

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १४़०३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २़६५४, बघेडा ३०़०१, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १२.४२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ८.८२ टक्के आहे़ जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १७़९२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १९ जुलै रोजी ६३ प्रकल्पात ३८़८७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ३०़२० एवढी होती.१२ प्रकल्प कोरडे तर काही प्रकल्पात मृतसाठापावसाळ्याचे जून, जुलै महिन्यात पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ६३ प्रकल्पापैकी १२ प्रकल्प कोरडे असून बहुतांश प्रकल्पात मृतसाठा आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांवर अस्मानी संकट ओढावले आहे. जिल्ह्यात अनेक गावात आजही जलसंकट कायम असून पाण्यासाठी वनवण भटकण्याची वेळ आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १८ टक्के पाऊस कमी बरसला आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई