शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आभाळ कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात सर्वाधिक २५४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. पाणी आसपासच्या शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : बोदरा तलावाची पाळ फुटली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वदूर आभाळ कोसळल्यासारखा पाऊस बसल्याने सर्वत्र हाहाकार उडाला असून नदी, नाल्यांना पूर येवून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली. साकोली तालुक्यातील बोदरा तलावाची पाळ फुटल्याने परिसरातील शेती जलमय झाली होती.जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात सर्वाधिक २५४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने बोदरा येथील तलावाची पाळ फुटली. पाणी आसपासच्या शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच मासेमारांचेही मोठे नुकसान झाले. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर फुटभर पाणी दिवसभर साचून होते. त्यामुहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली. तुमसर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुराने येरली रस्ता बंद झाला होता. या पुलावरून तीन फूट पाणी वाहत होती. लाखनी तालुक्यात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. लाखनी शहरातील काही भाग पूर्णत: जलमय झाल्याचे दिसत होते. पवनी, लाखांदूर, मोहाडी तालुक्यालाही या पावसाचा जबर फटका बसला. लाखनी तालुक्यातील मºहेगाव येथील पूलावरून पाणी वाहत होते.भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड, गौतमबुद्ध वॉर्ड, खात रोडवरील रूख्मिनीनगर आदी परिसरातील घरांची पडझड झाली. राज्य आपत्ती प्रतिसाद दल जिल्ह्यात दाखल झाले असून जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.(अधिक वृत्त पान २ वर)नाल्याच्या पुरात इसम वाहून गेलाकरडी (पालोरा) : नाला पार करताना ६२ वर्षीय इसम वाहून गेल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. गोविंदा वारलू गोबाडे (६२) असे वाहून गेलेल्याचे नाव आहे. जांभोरा येथील पुलाजवळील खोल पाण्यातून गावाकडे जात असताना पायातील चप्पल निघाली. ती चप्पल पकडण्यासाठी तो गेला असता खोल पाण्यात तोल जावून सरळ वाहत गेला. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी शोध मोहिम सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर थांगपत्ता लागला नव्हता.गत २४ तासात १६३.१ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात गत २४ तासात १६३.१ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात ९३९.३ मिमी पाऊस कोसळला. सर्वाधिक पाऊस साकोलीत २५४.४ मिमी, लाखनी २०१.८ मिमी, मोहाडी १८०.६ मिमी, भंडारा १७५.० मिमी, तुमसर १५३.० मिमी, लाखांदूर ९९.४ मिमी आणि पवनी तालुक्यात ७७.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष सरासरी पाऊस ९१८.८ मिमी आवश्यक असतो. जिल्ह्यात २१ ऑगस्टपर्यंत ९१८.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात पडणाºया पावसाच्या सरासरी १०२ टक्के म्हणजे ९३९.३ मिमी पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर