शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अंध-अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी

By admin | Updated: December 17, 2015 00:39 IST

सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले.

भंडारा : सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले. अहोरात्र जनजागृती केली. अंध अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी आहे व त्या दिशेने सर्वांनी पाऊले उचलली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन आ.बच्चू कडू यांनी केले. भंडारा येथील जलाराम मंगल कार्यालयात राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने २८ व्या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आ.कडू बोलत होते. राज्यातील दृष्टिहीन व्यक्ती एकत्रित येवून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी व एक व्यक्ती म्हणून समाजकार्यात तसेच देशहितासाठी आगेकूच करावी, ही स्वयंपे्ररीत भावना लक्षात घेऊन भंडारा येथे अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळा दि.२० डिसेंबरपर्यंत आयोजित केला आहे. याचे विधिवत उद्घाटन अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुमंत देशपांडे उपस्थित होते. अतिथी म्हणून आ.बच्चू कडू, सुप्रसिद्ध साहित्यीक हर्षल मेश्राम, बांधकाम व्यवसायीक सुनिल मेंढे, दृष्टिहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव, उपाध्यक्ष राजू भगत, महासचिव वसंत हेगडे, रविकांत बारड, पांडूरंग ठाकरे, लायन्स क्लबचे निर्वाण, संध्याताई निर्वाण, मनीष थुल, शुभदाताई पटवर्धन, विठ्ठल देशपांडे, गौरीशंकर बावणे, हर्षल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आ.कडू म्हणाले शासनाच्या वतीनेही असा सप्ताह सोहळा क्वचितच अंधांसाठी आयोजित केला असावा. भंडारा जिल्ह्यात हा सोहळा माझ्या हाताने उद्घाटीत होत आहे ही खरच माझ्यासाठी सौभाग्याची गरज आहे. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार व गुरुद्वाराची उंची वाढविण्यापेक्षा अंध व अपंगांच्या घरांची उंची वाढली पाहिजे. त्यांच्यासाठी लढायला माणसं समोर आली तर अंध माणसातही देव दिसला असे समजा. राज्यात यापूर्वी अंध व अपंगांची नोंद करण्यात येत नव्हती. मात्र आंदोलनानंतर राज्य शासनाने अंध व अपंगांची नोंद करायला सुरुवात केली आहे. अंध व अपंगांसाठी होत असलेल्या कायद्याची २५ टक्केही अंमलबजावणी होत नाही. कायदा असूनही अंमलबजावणी होत नसेल तर न्याय कुणाकडे मागावा? अशी स्थिती सध्या शासनाने निर्माण करून ठेवली आहे. अंध अपंगांच्या वेदना आपल्याला कळायला हव्यात. येणाऱ्या काळात अंध व अपंगांच्या मागण्यांसाठी जीवाचे रान करू, असा ठणठणीत इशाराही आ.कडू यांनी दिला. याप्रसंगी प्रा.डॉ.सुमंत देशपांडे, साहित्यिक हर्षल मेश्राम यांनीही अंध व अपंगांच्या समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करून उपाययोजनेबाबत सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष महादेव गुरव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पंडागळे यांनी तर आभार राजू भगत यांनी मानले. (प्रतिनिधी)