शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
2
"मामला 'गंभीर' है..."! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
3
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
4
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
5
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
6
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
7
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
8
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
9
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
10
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
11
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
12
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
13
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
14
SMAT 2025 : दोन टी-२० सामन्यात नाबाद २१४ धावा! १८ वर्षीय मुंबईकराचा शतकी धडाका
15
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
16
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
17
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
18
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
19
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
20
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंध-अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी

By admin | Updated: December 17, 2015 00:39 IST

सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले.

भंडारा : सेवाभाव हा भाव नसून एक धर्म आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा घडावी यासाठी महाराष्ट्रातील संतांनी रक्ताचे पाणी केले. अहोरात्र जनजागृती केली. अंध अपंगांची सेवा हीच खरी माणुसकी आहे व त्या दिशेने सर्वांनी पाऊले उचलली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन आ.बच्चू कडू यांनी केले. भंडारा येथील जलाराम मंगल कार्यालयात राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रच्या वतीने २८ व्या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आ.कडू बोलत होते. राज्यातील दृष्टिहीन व्यक्ती एकत्रित येवून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी व एक व्यक्ती म्हणून समाजकार्यात तसेच देशहितासाठी आगेकूच करावी, ही स्वयंपे्ररीत भावना लक्षात घेऊन भंडारा येथे अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताह सोहळा दि.२० डिसेंबरपर्यंत आयोजित केला आहे. याचे विधिवत उद्घाटन अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुमंत देशपांडे उपस्थित होते. अतिथी म्हणून आ.बच्चू कडू, सुप्रसिद्ध साहित्यीक हर्षल मेश्राम, बांधकाम व्यवसायीक सुनिल मेंढे, दृष्टिहीन संघाचे अध्यक्ष महादेव गुरव, उपाध्यक्ष राजू भगत, महासचिव वसंत हेगडे, रविकांत बारड, पांडूरंग ठाकरे, लायन्स क्लबचे निर्वाण, संध्याताई निर्वाण, मनीष थुल, शुभदाताई पटवर्धन, विठ्ठल देशपांडे, गौरीशंकर बावणे, हर्षल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आ.कडू म्हणाले शासनाच्या वतीनेही असा सप्ताह सोहळा क्वचितच अंधांसाठी आयोजित केला असावा. भंडारा जिल्ह्यात हा सोहळा माझ्या हाताने उद्घाटीत होत आहे ही खरच माझ्यासाठी सौभाग्याची गरज आहे. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार व गुरुद्वाराची उंची वाढविण्यापेक्षा अंध व अपंगांच्या घरांची उंची वाढली पाहिजे. त्यांच्यासाठी लढायला माणसं समोर आली तर अंध माणसातही देव दिसला असे समजा. राज्यात यापूर्वी अंध व अपंगांची नोंद करण्यात येत नव्हती. मात्र आंदोलनानंतर राज्य शासनाने अंध व अपंगांची नोंद करायला सुरुवात केली आहे. अंध व अपंगांसाठी होत असलेल्या कायद्याची २५ टक्केही अंमलबजावणी होत नाही. कायदा असूनही अंमलबजावणी होत नसेल तर न्याय कुणाकडे मागावा? अशी स्थिती सध्या शासनाने निर्माण करून ठेवली आहे. अंध अपंगांच्या वेदना आपल्याला कळायला हव्यात. येणाऱ्या काळात अंध व अपंगांच्या मागण्यांसाठी जीवाचे रान करू, असा ठणठणीत इशाराही आ.कडू यांनी दिला. याप्रसंगी प्रा.डॉ.सुमंत देशपांडे, साहित्यिक हर्षल मेश्राम यांनीही अंध व अपंगांच्या समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन करून उपाययोजनेबाबत सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना संघाचे अध्यक्ष महादेव गुरव यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पंडागळे यांनी तर आभार राजू भगत यांनी मानले. (प्रतिनिधी)