शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शाळा जमीनदोस्त; विद्यार्थी बसतात नभाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ते सातवीचे एकूण ७० विद्यार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर बसणार काय?.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी’ ही उक्ती मनी - ध्यानी घेऊन सोमवारी विद्यार्थी शाळेत पोहोचले. मात्र, शाळाच जमीनदोस्त झाल्याने नभाखाली या  विद्यार्थ्यांची शाळा भरली. तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील हे वास्तव शिक्षण क्षेत्रातील बोलकी अवस्था सांगायला पुरेसे आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना आजही ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी नागवला जात आहे काय? असेच वाटते.तुमसर तालुक्यातील रेंगेपार हे १,४०० लोकवस्तीचे गाव. या गावात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीचे एकूण १०५ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येथे येतात. गत दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या. सोमवारपासून ग्रामीण क्षेत्रातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या. रेंगेपार येथील विद्यार्थीही सोमवारी शाळेची घंटा वाजताच पोहोचले. मात्र, येथे बसायला वर्गखोलीच नव्हती. शाळेची इमारत जीर्ण होऊन कधीचीच पडली. उरली फक्त एक खोली. या खोलीतही शैक्षणिक व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. आता या विद्यार्थ्यांना उघड्यावरच नभाखाली बसविण्यात आले. आडोशाला टेकून फळा ठेवण्यात आला. मोठी दरी पसरवून त्यावर विद्यार्थी बसले. इयत्ता पाचवी ते सातवीचे एकूण ७० विद्यार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर बसणार काय?.  ऊन, वारा, पाऊस याची त्यांना तमा नाही काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी निधीच उपलब्ध झालेला नाही. परिणामी रेंगेपार विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी बाहेर आपल्या मित्रमंडळींसह ज्ञानार्जनासाठी बसले.रेंगेपार येथील शाळा परिसरात आता फक्त एक खोली आहे. याच खोलीत अन्नधान्य, टेबल खुर्च्या व अन्य शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. याच खोलीत आहार शिजविला जातो. शासनाकडून मिळालेली पुस्तकेही येथेच ठेवण्यात आलेली आहेत. एकाच खोलीवर संपूर्ण भार सध्या येथे दिसून येत आहे.या शाळेत एकूण पाच शिक्षकांची पदे आहेत. यात एक मुख्याध्यापक तर चार सहायक शिक्षक आहेत. यापैकी दोन शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना, अशी शक्यता बळावली आहे.

प्रशासकीय मान्यता पण वर्कऑर्डर नाही दोन वर्षांपूर्वी रेंगेपार येथे दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता. यावर १५ लाख रुपये खर्चून दोन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली  आहे. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने वर्क ऑर्डर निघाली नाही. परिणामी वर्गखोल्यांचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर वैनगंगा नदीचे पात्र आहे. अरुंद रस्ता आहे. रस्ताच या शाळेची सीमारेषा आहे. शाळेची इमारत नसल्याने सुरक्षा भिंत शाळेला कशी असणार? त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवही धोक्यात आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा ग्रामीण स्तरावर इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थी बाहेर बसतात. वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे तरी कुठे? याशिवाय कोरोना संसर्ग काळात सोशल डिस्टन्सिंगचे व नियमांचे पालन करणे हे महत्त्वाचे आहे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.  किंबहुना इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग अजूनही सुरू झाले नाही. ते जर सुरू झाले, तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याशिवाय राहणार नाही.

वर्गखोली बांधकामाबाबत जिल्हा स्तरावरून निधी मंजूर करण्यात येतो. शाळेची वैयक्तिक पाहणी केली असून, या संदर्भात आमचा पाठपुरावा सुरू आहे. -विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी, तुमसर.दोन वर्षांपूर्वी पाठविलेल्या प्रस्तावावर सरतेशेवटी प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, निधीचा थांगपत्ता नसल्याने वर्कऑर्डर मिळू शकले नाही. परिणामी, शाळेचा टोला वाजला, तरी आमचे विद्यार्थी खुल्या नभाखाली बसले आहेत. यापेक्षा मोठी शोकांतिका काय म्हणावी. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून लवकर वर्गखोल्यांचे बांधकाम व प्रसाधनगृह व अन्य खोली बांधून द्यावी, अशी मागणी आहे.-कलाम शेख, माजी सभापती, पंचायत समिती, तुमसर  

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी