विजेच्या नियोजनासाठी सरपंचांची बैठक
By Admin | Updated: May 4, 2017 00:32 IST2017-05-04T00:32:01+5:302017-05-04T00:32:01+5:30
वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता ....

विजेच्या नियोजनासाठी सरपंचांची बैठक
सहकार्य अपेक्षित : वीज विभागाने दिली योजनांची माहिती
पालांदूर : वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता गावकऱ्यांची अर्थात सरपंचांची भूमिका सकारात्मक असावी. वेळी अवेळी खंडीत वीजेला सुरळित करण्याकरीता लागणाऱ्या विलंबनाला समजून घेत वीज विभागाला सहकार्य करावे, असे उपकार्यकारी अभियंता अमीत शहारे व सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी सरपंचांना केले.
मे हिट सुरू झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. पुरवठा कायम असून मागणीत लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रणेवर ताण वाढला आहे. यामुळे खंडीत वीजेचे प्रमाण वाढून तत्काळ सेवेला विलंब होत असल्याने लाईनमन व ग्राहक यांच्या दुरावा वाढून संबंध बिगडतात, हे होऊ नये वास्तविकता काय असते याची जाणीव करूनच निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.
पालांदूर परिसरातील बरेच गावच्या सरपंचांनी वीज विभागच्या निमंत्रणाला साथ देत वीज कार्यालय पालांदुरात हजेरी लावली होती. सरपंचांनी गावातील समस्यांचे निवेदन अभियंत्यांना देत आमच्या समस्या वरिष्ठांना कळविण्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच शुभांगी मदनकर (पालांदूर), गजानन शिवणकर (ढिवरखेडा), हेमंतकुमार सेलोकर (खुनारी) यांनी १६ तासांच्या थ्री फेज कृषीवीज वीजे संबंधाने तक्रार मांडली. यात १६ तासांच्या सलग वीजपुरवठ्याने गावातील सार्वजनिक, वैयक्तीक विहिरी आटल्या. हातपंप यात पाणी नाही, नळयोजनेलाही मुबलक पाणी नाही तसेच सिंगल फेजमुळे विजेच्या दाबाची समस्या आहे.
शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व अधिक देत वीज विभागाने सुद्धा सावधगिरी बाळगावी. सार्वजनिक हिताला जिथे बांधा निर्माण होते अशाठिकाणी वीज पुरवठा करू नये, तसेच गावातनू ५०० मीटरच्या लांबच धानपिकाला वीज द्यावी. सध्या गावाला लागूनच धानपिक घेतले जात असल्याने पाण्याचा उपसा अधिक होत असून गावतलाव, विहिरींनी तळ गाठला आहे.
वीज विभागाने कर्मचारी वाढवावे त्यांना ग्राहकांशी बोलण्याची परिभाषा समजावी ताण कितीही वाढला तरी ग्राहक याला जबाबदार नाही याची जाणीव लाईनमनला असावी. गावातील वीजवाहक तार लोंबकळत असतात त्यांना तणाव देवून अपघात टाळण्याला सहकार्य करावे. जीर्ण खांब बदलवावे, वाढीव खांब त्वरीत कार्यान्वीत करावे.
कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट असावी, आदी सुचना वीज विभागाला सरपंचानी दिला. विशेष म्हणजे सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी बोलविलेली सभा प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरल्याने नियमित बैठका होण्याचे सुद्धा सरपंचानी सांगितले. यावेळी सरपंच पुरूषोत्तम फटे (खराशी), यशवंत कठाणे (गुरठा), जयमाला राघोर्ते (रेंगोळा), जितेंद्र बोरकर (गोंडेगाव), प्रशांत मासुरकर (मांगली) आदी उपस्थितीत होते. (वार्ताहर)
पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेअंतर्गत २.६८ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. मे महिन्यात मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीचे कामे युद्धस्तरावर केली जाणार असून यावेळेत खंडीत वीजेचे प्रमाण वाढणार आहे. नवीन जीव कनेक्शन मागणीनुसार टप्पाटप्याने यांत्रिक सामुग्री तपासून घेण्यात येतील. तेव्हा सहकार्याची अपेक्षा अपेक्षित आहे.
-अमित शहारे, कार्यकारी अभियंता पालांदूर (लाखनी).