शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

वाहतुकीसाठी रेती तस्करांनी पाेखरली नदीची थडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर बुडीत क्षेत्रातील घाटांची संख्या ६० वर आली आहे. मात्र गत १४ महिन्यांपासून जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तेथे माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत आहे.

ठळक मुद्देघाटालगतच्या गावांना पुराचा धाेका

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा बेसुमार उपसा सुरु असून थेट नदीपात्रातून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी तस्कर नदीची नैसर्गिक संरक्षक भिंत थडी फाेडून रस्ता करीत आहे. यामुळे घाटानजीकच्या गावांना पुराचा धाेका संभावत आहे. वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीसह इतर ठिकाणी हा प्रकार दिसुन येत आहे. दुसरीकडे अवैध उत्खननाने शासनाचा काेट्यवधींचा महसूल बुडत आहे.भंडारा जिल्ह्याला नैसर्गिक वरदान लाभले आहे. विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर बुडीत क्षेत्रातील घाटांची संख्या ६० वर आली आहे. मात्र गत १४ महिन्यांपासून जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तेथे माेठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन हाेत आहे. चांदमारा, आष्टी, धुटेरा, गुडेगाव, धानाेरी, यनाेटा, बेटाळा, राेहा, माडगी, ढाेरवाडा, निलज, ब्राम्हणी, उमरवाडा, रेंगेपार यासह चुलबंद नदीवरील गवराळा, नांदेड, धर्मपुरी, इटान घाटावर माेठ्या प्रमाणात उपसा हाेत आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करुन त्याची ट्रक, टिप्पर आिण ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रेती तस्कर नदीची नैसर्गिक संरक्षक भिंत थडी फाेडतात. प्रत्येक घाटावर नदीथळ फाेडून रस्ता तयार केल्याचे दिसून येते. मात्र या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसते. केवळ रेती तस्करांवर दंडात्मक कारवाई करुन महसूल विभाग त्यांना साेडून देते. परंतु पर्यावरणाचे हाेणारे नुकसानीकडे कुणाचेही लक्ष नाही. पवनी तालुक्यातील घाटावर जाण्यासाठी चक्क कालवा मार्गाचा उपयाेग केला जाताे. दाेन ते अडीच किलाेमिटर कालव्यावरुन रेतीचे ट्रक धावत असल्याने कालव्याच्या अस्तित्वाला धाेका निर्माण झाला आहे.नदीची थडी फाेडल्याने सर्वाधिक धाेका पावसाळ्यात तीरावरील गावांना बसताे. फाेडलेल्या थडीतून पुराचे पाणी थेट गावात शिरते. गत ऑगस्ट महिन्यात महापूर आला हाेता. या महापूराचा सर्वाधिक फटका रेतीघाटानजीक असलेल्या गावांना बसल्याचे दिसून येते. रेतीतस्कर आपल्या फायद्यासाठी नदीचे अस्तित्वच धाेक्यात आणत आहे. 

नदीपात्रात माेठाले खड्डे रेती उत्खननासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जाताे. सर्व नियमांना तिलांजली देवून खडक लागेपर्यंत रेतीचा उपसा केला जाताे. अनेक ठिकाणी रेती उपसामुळे माेठाले खड्डे पडले आहेत. याखड्यामुळे अपघातांची भीती असते. परंतु हा सर्व प्रकार बिनबाेभाट सुरु असून याकडे कुणाचेही लक्ष नाही.रस्त्यांची लागली वाट रेती वाहतूकीमुळे घाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याची वाट लागली आहे. अहाेरात्र अवजड वाहतूक हाेत असल्याने रस्ते उखडले आहे. ठिकठिकाणी माेठाले खड्डे पडले आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया